शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

महिला तलाठ्याच्या प्रयत्नामुळे वाचले जखमी व्यक्तीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:30 IST

संकटकाळात मदतीला धावून जाणाऱ्यांचे कौतुक Date: 1 Jun 2021 दारव्हा : तालुक्यातील एका महिला तलाठ्याने धावपळ करून गंभीर जखमी ...

संकटकाळात मदतीला धावून जाणाऱ्यांचे कौतुक

Date: 1 Jun 2021

दारव्हा : तालुक्यातील एका महिला तलाठ्याने धावपळ करून गंभीर जखमी अवस्थेतील एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. समाजभान हरविलेल्या या कोरोनाच्या काळात हिंमत दाखविणारी तलाठी व या कामी मदत करणाऱ्या इतरांचे कौतुक होत आहे.

तालुक्यातील हातगाव येथील तलाठी प्रियंका येईलवाड आपल्या पतीसह सोमवारला कार्यालयात जाण्याकरिता दारव्ह्याकडे येत होत्या. त्यावेळी त्यांना यवतमाळ नजीकच्या घाटात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत उन्हात विव्हळत पडलेला दिसला. त्यांनी थांबून त्याला आगोदर सावलीत नेले. त्यानंतर १०८ नंबरवर ॲम्बुलन्ससाठी फोन केला. तेव्हा गाडी पाठवितो असे उत्तर मिळाले. पण क्षणाक्षणाला त्याची अवस्था बिघडत चालली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. परंतु त्याला घेऊन कसे जावे हा मोठा प्रश्न होता. यासाठी त्यांनी रस्त्यावरून जाणारी चारचाकी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. खूप जणांना हात दाखविले. परिस्थिती समजावून सांगितली. परंतु प्रयत्न करूनही कुणी थांबण्यास तयार नव्हते. तेवढ्यात रसिका मोगरे व त्यांचा भाऊ सागर मोगरे त्यांच्या मदतीला थांबले. सर्वांनी मिळून वाहन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळानंतर प्रयत्नांना यश आले. दारव्हा येथील अर्जुन जाधव नावाचे शिक्षक या मार्गाने जात असताना त्यांना हात दाखवून थांबविले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमीला आपल्या गाडीतून रुग्णालयात नेण्याची तयारी दर्शविली. सर्वांनी मिळून जखमीला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे लोक एकमेकांपासून दुरावले आहेत. परिस्थिती एवढी गंभीर बनली की संकटाच्या काळातही कुणी कुणाला मदत करायला तयार होत नाही. परंतु सोमवारच्या या घटनेनंतर मात्र माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय आला. जीवाची पर्वा न करता अर्जुन जाधव, तलाठी प्रियंका येईलवाड, त्यांचे पती प्रवीण चिलकुलवार, रसिका मोगरे व सागर मोगरे यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचविले. त्यांच्या या कार्यामुळे समाजामध्ये सकारात्मक संदेश गेला.