शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार शेकडो विकासकामे

By admin | Updated: February 28, 2015 02:07 IST

जलयुक्त शिवार अभियान शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच ..

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियान शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच अभियानातील गावे विकासाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यावर भर राहणार आहे. त्यामुळे या अभियानात विविध शासकीय विभागांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. अभियानातील कामगिरीवरून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपला चांगला सहभाग नोंदवावा, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानांर्तगत करावयाच्या कामांचा आढावा शुक्रवारी घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.कृषी, पाणी पुरवठा, जलसंपदा, जलसंधारण या जलयुक्त शिवार अभियानातील यंत्रणांसह अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये विविध विकासाची कामे राबविणाऱ्या कार्यालयांचा अंतिम आराखडा पालकमंत्र्यांनी बैठकीत जाणून घेतला. तसेच अभियानातील गावे विकासाच्याबाबतीत परिपूर्ण करण्यासाठी जून अखेर अधिकाधिक कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शासन लोकांना चांगली सेवा देण्याचे काम करीत असते. हे काम अधिक प्रभाविपणे होणे आवश्यक आहे. तळागाळातील सर्वसामान्य नागरिकाला दिलासा देण्यासाठी अभियानांतर्गत सामूहिकपणे प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. अभियानांतर्गत एकूण २७ विभाग जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये विकास कामे राबविणार असून या सर्व विभागांचे विकास आराखडे पूर्ण झाले आहे. सदर विभाग शेकडो कामे जून अखेरपर्यंत यातून करणार आहे. यामध्ये सबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणे गरजेचे असून कुणाचाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा लोकांवर योग्य कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या अभियानात प्रामुख्याने पाणी टंचाई निवारणासोबतच वीज, पशुसंवर्धन, वनविभाग, महसूल, पोलीस अशा विविध विभागांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)आर्थिक मदतीचे आवाहनपाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माणच होवू नये यासाठी विविध कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभियानांतर्गत पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी विविध कामे घेण्यात येणार आहे. अस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता वाढविणे, लोकसहभागातून विविध जलस्त्रोतामधील गाळ काढणे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन, शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडविणे, पाणी जीरविणे यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे व जनजागृती तसेच माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, सलग समतोल चर, गाळ काढणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी व लोकसहभाग आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध यंत्रणेमार्फत ही कामे होणार असून त्यासाठी नागरिकांची मदत लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, सहकारी संस्था, अशासकीय संस्था तसेच वेगवेगळ्या संस्थांनी आर्थिक मदत, लोकसहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांनी केले आहे. आर्थिक मदत देवू इच्छिणाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले.