शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत संगणक परिचालक संपावर

By admin | Updated: December 4, 2014 23:15 IST

पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करून सुसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत योजना सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविली जात आहे. त्यासाठी संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यवतमाळ : पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करून सुसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत योजना सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविली जात आहे. त्यासाठी संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना महाआॅनलाईन कंपनी तुटपूंजे वेतन देत असून, तेही अटी-शर्ती लादून. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्रात ई-पंचायत या प्रकल्पाची अंमलबजावणी संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) या नावाने करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर संगणक देण्यात आले असून, त्यातून पंचायतराज बळकटीकरण आणि कारभारात सुसूत्रता आणण्याचा हेतु आहे. परंतु याठिकाणी नियुक्त केलेल्या संगणक परिचालकांना महाआॅनलाईन कंपनी योग्य वेतन देत नाही. २०११च्या जनगणनेनुसार एक हजार लोकसंख्ये पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला एक पूर्ण वेळ संगणक परिचालक नियुक्त करण्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. त्यासाठी आठ हजार रुपये मानधन देण्याचेही निश्चित करण्यात आले. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील संगणक परिचालकांना योग्य रक्कमच दिली जात नाही. गेल्या तीन वर्षांपासून संगणक परिचालक अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करीत आहे.
आता तर शासनाचे कोणतेही परिपत्रक नसताना महिन्याला ४५० डाटा एंट्री करणे कंपनीने सक्तीचे केले आहे. तसे न केल्यास मानधन मिळणार नसल्याचे सांगत आहे. तालुका समन्वयक व जिल्हा समन्वयका मार्फत हा प्रकार सक्तीचा केला आहे. दर दिवसाची हजेरी युनीटी आयटीच्या सॉफ्टवेअरमध्ये लावली जाते मात्र मानधन दिले जात नाही. या सर्व प्रकाराच्या विरोधात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने आवाज उठविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १२०७ ग्रामपंचयतीतील संगणक परिचालक २ डिसेंबरपासून संपात सहभागी झाले आहे. कंत्राटी पद्धत (महाआॅनलाईन कंपनी) रद्द करून संगणक परिचालकांना शासन सेवेत सामावून घ्यावे, शासन निर्णयानुसार प्रतिमाह आठ हजार रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)