शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

केशोरीला तालुक्याचा दर्जा द्या

By admin | Updated: October 10, 2015 02:23 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसर नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, जंगलव्याप्त, डोंगराळ, आदिवासी व मागासलेला भाग म्हणून प्रसिद्ध आहे.

नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भाग : तालुका निर्मिती संघर्ष समितीची मागणीकेशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसर नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, जंगलव्याप्त, डोंगराळ, आदिवासी व मागासलेला भाग म्हणून प्रसिद्ध आहे. या भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केशोरीला तालुका निर्माण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय या भागाचा विकास होऊ शकणार नाही. यासाठी परिसरातील ग्रामपंचायतींसह तालुका निर्मिती संघर्ष समितीचे कार्यकर्ता योगेश नाकाडे, गुणवंत पेशने, प्रकाश वलथरे यांनी केशोरी तालुका घोषित करावा, अशा मागणीचे निवेदन शासनाकडे सादर केले आहे.केशोरी व परिसरातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याचे अंतर ५० किमीपेक्षा अधिक असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना तालुक्याची कामे करण्यासाठी मोठाच त्रास सहन करावा लागतो. तसेच तालुक्याला ये-जा करण्यासाठी योग्य रस्ते व दळणवळणाची साधनेसुद्धा नाहीत. १६ वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. तेव्हाही केशोरीला तालुका घोषित करण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु त्यावेळी तत्कालीन शासनाने या मागणीची दखल घेतली नाही, ही मोठीच शोकांतिका म्हणावी लागेल. शासनाची ध्येयधोरणे व संकल्पनेनुसार राष्ट्राची प्रगती साधायची असेल तर पर्यायाने गावागावाची प्रगती साधायची असेल तर जिल्हे लहान, तालुके लहान झाल्याशिवाय ते शक्य नाही. शासन स्तरावरून नेहमीच अशी संकल्पना व्यक्त केली जाते.परंतु प्रत्यक्षात तशी कृती होत नाही, त्यामुळेच विकास होत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या सीमेचा विचार केला तर विस्ताराने अर्जुनी-मोरगाव तालुका जिल्ह्यात सर्वात मोठा आहे. या तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे अंतर ५० किमीच्या वर आहे. त्यामुळे केशोरी परिसर मूलभूत विकासापासून कोसो दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. केशोरी हे गाव या परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. या ठिकाणी मिरची व धान्याची मोठी बाजारपेठ आहे. हा परिसर वनसंपदेने नटलेला आहे. यापासून औषध निर्मितीचे कारखाने निर्माण करून औद्योगिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. या ठिकाणी सर्व विभागाचे शासकीय व निमशासकीय कार्यालये असून प्राथमिक शिक्षण ते पदवी शिक्षणापर्यंत सर्व माध्यमांची सोय आहे. येथून प्रतापगड, नवेगावबांध, तिबेटी कॅम्प, बंगाली कॅम्प व इटियाडोह जलाशयासारखी पर्यटन स्थळे जवळच आहेत. या सर्व बाबींचा विचार करून केशोरी तालुका निर्मितीसाठी शासनाशी संघर्ष करण्याची भूमिका स्पष्ट करीत केशोरी तालुका घोषित झालाच पाहिजे, या मागणीकरिता परिसरातील ग्रामपंचायतींसह केशोरी तालुका निर्मिती संघर्ष समितीचे कार्यकर्ते योगेश नाकाडे, गुणवंत पेशने, प्रकाश वलथरे यांनी निवेदन देवून शासनाकडे मागणी केली आहे. (वार्ताहर)