शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

थेट नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा

By admin | Updated: October 21, 2016 02:11 IST

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ आणि अविश्वास प्रक्रियेसंदर्भातील संभ्रम दूर झाला आहे.

निवडणूक विभाग : दोन वर्षानंतर आणता येणार अविश्वास यवतमाळ : थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ आणि अविश्वास प्रक्रियेसंदर्भातील संभ्रम दूर झाला आहे. नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणार आहे असून दोन वर्षानंतर अविश्वास आणता येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. राज्य शासनाने नगरपरिषदेत स्थिर सत्ता देण्यासाठी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ५ आक्टोबर रोजी आरक्षण काढण्यात आले. मात्र त्यानंतरही अध्यक्षपदाचा कार्यकाळी किती वर्षांचा राहणार, थेट जनतेतून आल्याने नगराध्यक्ष, नगरसेवकांना उत्तरदायी राहणार की नाही, याबाबत संभ्रम होता. नगराध्यक्ष थेट जनेतून असला तरी त्यांना सभागृहात बहुमतानेच निर्णय घ्यावा लागणार आहे. सदस्यांना दोन तृतीयांश बहुमताने अविश्वास आणता येणार आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे देशमुख यांनी जाहीर केले. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र आयोगाने दिलेल्या वेब साईटवर भरावयाचा आहे. त्यानंतर या अर्जाची प्रिन्ट काढून तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जमा करावयाचा आहे. हे नामनिर्देशन पत्र २९ सप्टेंबरला दुपारी ३ वाजतापर्यंत स्वीकारण्यात येईल. नंतर छाननी, नामांकन मागे घेणे आणि प्रत्यक्ष मतदान २७ नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्याच दिवशी २८ नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यवतमाळात एकूण २८५ मतदार केंद्र राहणार आहे. शहरात मतदारांची संख्या दोन लाख ३३ हजार ४०५ असून त्यात एक लाख १९ हजार ६८८ पूरश, तर एक लाख १३ हजार ६९९ महिला आणि इतर १८ मतदार आहे. २८ प्रभागातील प्रत्येक मतदान केंद्रावर ८०० ते ८५० इतकेच मतदार राहणार आहे. मतदाराला दोन बॅलेट युनिटमध्ये तीन मतदान करायचे आहे. पहिले बॅलेट युनिट नगरसेवकांसाठी असून तेथे दोन बटन दाबायचे आहे. नगराध्यक्षासाठीच्या बॅलेट युनिटमध्ये एक बटन दाबायचे आहे. या दोन्ही युनिटमध्ये नोटाचे बटन देण्यात आले असून मतदारांचा नकाराधिकार कायम ठेवण्यात आला आहे. शहरात आदर्श अचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यकरिता चार पथक तयार करण्यात आले आहे. या सोबतच व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक राहील. या पथकात चार कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर आणि एक पोलीस अधिकारी राहील. आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार देण्यासाठी १८००२३३६३५८ टोल फ्री क्रमांक आहे. शहरातील आर्णी रोड, पाढंरकवडा रोड, बाभूळगांव रोड, दारव्हा रोड या चार ठिकाणी चेकपोस्टच्या माध्यमातून दारू, पैसा, प्रचार साहित्य, अवैध शस्त्र यावर पाळत ठेवली जाईल्. उमेदवारांना तहसीलमध्ये वाहन परवाना, प्रचार कार्यालय परवाना, फ्लॅक्स, बॅनर परवाना, सभा, लाउडस्पिकर, मिरवणूक आदी परवानगी घेण्यासाठी एक खिडकीची व्यवस्था करण्यात आल्याचे राजेंद्र देशमुख यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)