शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या

By admin | Updated: August 22, 2014 00:08 IST

सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाचा वाढता बोझा याला कंटाळून एका शेतकरी पूत्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना लगतच्या बेचखेडा येथे घडली. या घटनेने

बेचखेडा : कर्जापायी मृत्यूला कवटाळलेहिवरी : सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाचा वाढता बोझा याला कंटाळून एका शेतकरी पूत्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना लगतच्या बेचखेडा येथे घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. राजू रामेश्वर मडावी (३३) रा.बेचखेडा असे मृत शेतकरी पूत्राचे नाव आहे. सततच्या नापिकीने त्याच्या वडिलांवर पीक कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यातच वडील आजारी पडल्याने ती जबाबदारी राजूवर येवून पडली. अशातच स्वत:चे आणि भावाचे लग्न कसे करायचे याची चिंता त्याला भेडसावत होती. काही दिवसांपूर्वी त्याने कर्जाचे पुनर्गठन करावे यासाठी बँकेकडे पाठपुरावा केला. मात्र कर्जाच्या पुनर्गठनाला बँकेने नकार दिला. त्यामुळे हताश होवून राजूने १७ आॅगस्टला दुपारी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच राजूच्या नातेवाईकांनी त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर बुधवारी २० आॅगस्टला त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर राजूचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. राजूच्या मागे वृद्ध आई, वडील आणि भाऊ असा आप्त परिवार आहे. राजूच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.शिवाय या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कर्ज पुनर्गठनास नकार देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही मृत राजूच्या कुटुंबीयांनी केली आहे. (वार्ताहर)