शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

शेतकरी आत्महत्या म्हणजे राष्ट्रीय आपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST

चिलगव्हाण येथील साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने ३५ वर्षांपूर्वी पत्नी मालती, मुलगा भगवान आणि सारीका, मंगला व विश्रांती या मुलींसह सहकुटुंब आत्महत्या केली होती. देशभराच्या वृत्तपत्रांमधून गाजलेली ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. त्यानंतर ३५ वर्षांत लाखो शेतकऱ्यांनी मरण कवटाळले. हे शासकीय व्यवस्थेने केलेले खूनच आहेत, असा संताप अमर हबीब यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देअमर हबीब यांचे प्रतिपादन, चिलगव्हाण येथे अन्नत्याग आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शेतकरी आत्महत्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. ही राष्ट्रीय आपत्ती असून शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे रद्द करणे हे आपल्या सर्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे प्रतिपादन शेती प्रश्नांचे अभ्यासक तथा अन्नत्याग आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले.तालुक्यातील चिलगव्हाण येथे शुक्रवारी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनात त्यांनी सरकारच्या शेतीविरोधी धोरणावर जोरदार हल्ला केला. चिलगव्हाण येथील साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने ३५ वर्षांपूर्वी पत्नी मालती, मुलगा भगवान आणि सारीका, मंगला व विश्रांती या मुलींसह सहकुटुंब आत्महत्या केली होती. देशभराच्या वृत्तपत्रांमधून गाजलेली ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. त्यानंतर ३५ वर्षांत लाखो शेतकऱ्यांनी मरण कवटाळले. हे शासकीय व्यवस्थेने केलेले खूनच आहेत, असा संताप अमर हबीब यांनी व्यक्त केला.साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त किसान पुत्रांनी चिलगव्हाण येथे शुक्रवारी दिवसभर उपवास करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. समारोप करताना मशाल पेटवून आंदोलनाची धग कायम ठेवण्याचे आवाहन हबीब यांनी केले. यावेळी उमरखेडचे आमदार नामदेव ससाने, अनंत देशपांडे, संदीप धावडे, प्रमोद जाधव, हनुमंत पाटील, अविनाश पोळकट, पंकजपाल महाराज, संतोष अरसोड, पुरुषोत्तम गावंडे, प्रेम हनवते डॉ. संदीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

चिलगव्हाण येथे स्मारक उभारणारशेतकरी आत्महत्यांकडे समाजाचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साहेबराव करपे कुटुंबियांचे गाव असलेल्या चिलगव्हाण येथे स्मारक उभे राहावे, यासाठी किसानपुत्र आंदोलन सर्व शक्तीनिशी सहकार्य करेल, अशी घोषणा अमर हबीब यांनी केली. तसेच केंद्राने पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना किसानपुत्र आंदोलनाचा विरोध नाही, पण सीलिंग, आवश्यक वस्तू, हे जीवघेणे कायदे समूळ रद्द करणे जास्त गरजेचे आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचा लढा सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आत्महत्याग्रस्तांसाठी नव्या संस्थेचा संकल्प आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी व तमाम शेतकऱ्यांना नरभक्षी कायद्यांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी नवीन संस्था गठित करीत असल्याचे अमर हबीब यांनी सांगितले. ही संस्था शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटत राहील, अशी घोषणा किसानपुत्र आंदोलनाच्यावतीने करण्यात आली. संस्थेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल व आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक मदतीसाठी संवैधानिक लढा उभा केला जाईल. 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या