शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे महिने संपले तरी जिल्ह्यात निम्माच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. काही मोजके प्रकल्प याला अपवाद आहे. यामुळे ओलितावर मर्यादा येणार आहे. पूस, बेंबळा, नवरगाव, सायखेडा, बोरगाव, निळोना आणि चापडोह प्रकल्प निर्धारित क्षमतेच्या १०० टक्के भरले. मात्र इतर १०७ प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के साठा झाला आहे.

ठळक मुद्देकेवळ ५२ टक्के बरसला ।आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या महिन्यात रिमझीम पाऊस जिल्ह्यात बरसला. परिणामी सप्टेंबर मध्यापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाला. आता पावसाळा संपत असून येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा धोका वर्तविला जात आहे.जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. काही मोजके प्रकल्प याला अपवाद आहे. यामुळे ओलितावर मर्यादा येणार आहे. पूस, बेंबळा, नवरगाव, सायखेडा, बोरगाव, निळोना आणि चापडोह प्रकल्प निर्धारित क्षमतेच्या १०० टक्के भरले. मात्र इतर १०७ प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के साठा झाला आहे. तर दुसरीकडे सततच्या ढगाळ वातावरणाने कापूस पिकावर अळी, तुडतुडे आणि रोगांचे प्रमाण वाढले आहे. दररोज पावसाळी वातावरण कायम असले तरी जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडुंब भरण्याइतका पाऊस अद्यापही झालेला नाही. उलट सततच्या पावसाळी वातावरणामुळे शेत पिकांवर रोगराई पसरत आहे. तर रुग्णालयातही साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहे.तालुकानिहाय पावसाचा टक्कायवतमाळ ३९.७०बाभूळगाव ५५.७९कळंब ४६.९०आर्णी ७१.९२दारव्हा ४७.७९दिग्रस ४८.६७नेर ५३.२६पुसद ६३.६८उमरखेड ५५.३०महागाव ५६.३८केळापूर ४९.६८घाटंजी ४६.१५राळेगाव ४६.८३वणी ६१.३०मारेगाव ५५.७७झरीजामणी ४८.६६एकूण ५२.६८

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीकपात