शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: December 22, 2016 00:14 IST

शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

दारव्हा : शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून निघालेला मोर्चा तहसीलवर पोहोचल्यानंतर याठिकाणी सभा घेण्यात आली.
मोर्चात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, पक्षाचे निरीक्षक श्याम उमाळकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, देवानंद पवार, मनमोहनसिंह चव्हाण, पंढरीनाथ सिंहे, माजी नगराध्यक्ष सैयद फारूक, अशोक चिरडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, महिला काँग्रेसच्या विजया सांगळे यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
आजच्या घडीला जनसामान्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या समस्या सोडवायच्या सोडून सरकार नाही ते प्रश्न उपस्थित करून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केला. प्रसंगी संजय देशमुख, श्याम उमाळकर, देवानंद पवार, विजया सांगळे, ज्ञानेश्वर बोरकर, पंढरीनाथ सिंहे आदींची भाषणे झाली. नोटबंदी, मायक्रो फायनान्स, शासनाचे शेतकरी विरोधी धोरण, जनधन योजना यासह विविध विषयांचा आपल्या भाषणात उल्लेख करून केंद्र व राज्य शासनावर टीकेची झोड उठविली.
उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, उद्योजकांच्या धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, संपूर्ण कार्डधारकांना रेशनचा पुरवठा व्हावा, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, गरजूंना घरकुले द्यावी, महिला बचत गट आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ व्हावे, श्रावणबाळ योजनेचे अनुदान वाढवून मिळावे आदी मागण्यांचा समावेश या निवेदनात केला आहे. (तालुका प्रतिनिधी)