शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

चुलीवरच्या स्वयंपाकाचा हरवत चाललाय गोडवा

By admin | Updated: October 26, 2015 02:24 IST

शहराप्रमाणे ग्रामीण भागाचे चित्रसुद्धा या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे गावामध्येही स्वयंपाकघरात गॅसचा शिरकाव होऊन चुलीवरचा गोडवा हरवत चालला आहे.

नेर : शहराप्रमाणे ग्रामीण भागाचे चित्रसुद्धा या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे गावामध्येही स्वयंपाकघरात गॅसचा शिरकाव होऊन चुलीवरचा गोडवा हरवत चालला आहे. स्वयंपाक घरातील चुलीची जागा आता गॅस सिलिंडरने घेतली आहे. पूर्वी ग्रामीण भागात गोधन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे घरोघरी गोवऱ्या थापल्या जायच्या. पावसाळा गोवऱ्याच्या भरवशावर जायचा. जंगलातून सरपण आणण्याचीही तेवढी गरज नव्हती. आता मात्र गावातही गोवऱ्यापासून स्वयंपाक करणे कमी झाले असून केवळ पाणगे करण्यापुरत्याच गोवऱ्या वापरल्या जातात. शिवाय तुराट्या, पऱ्हाट्या, फणकट शेतातच स्वाहा केल्या जातात.पूर्वी याची सरपण म्हणून खेडोपाडी ओझे-ओझे जमा करून गंजी लावली जायची. आता त्या गंज्या अल्प आहेत. पूर्वी झाडे तोडण्याची गरज पडत नव्हती. चुलीवरचा स्वयंपाक हा मंद आणि हळू शिजत असतो. त्यामुळे त्यात अन्न कच्चे राहण्याची शक्यताही नसते. अर्धा स्वयंपाक तर निखाऱ्यावरच होऊन जात असे. मात्र चित्र पलटले असून केवळ हौसेपुरत्या घरी चुली राहिल्या आहेत. भाकर खावी तर चुलीवरची, अशी म्हण आजही सर्वत्र प्रचलित आहे. परंतु आता गॅसवरच भाकर केली जात असल्याने ती तेवढी कडक होत नाही. परिणामी त्याचाही गोडवा हरवत चालला आहे. लग्नसमारंभात केवळ भातकुलीचा खेळ मांडण्यापुरतीच चूल बांधली जात असून त्या पद्धतीचाही विसर पडण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या काळानुरूप शहरी भागाचे लोण आता ग्रामीण भागातही पडत असल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)