शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या कुबड्यांवर आॅडिट

By admin | Updated: November 24, 2014 23:06 IST

ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी स्थानिक निधी लेखापरीक्षकांकडे असताना गेल्या कित्येक दशकापासून लेखापरीक्षण झाले नसल्याचे पुढे आले आहे. आता ग्रामपंचयतीचे

ग्रामपंचायत : विस्तार अधिकारी नियुक्त करणार
सुरेंद्र राऊत - यवतमाळ
ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी स्थानिक निधी लेखापरीक्षकांकडे असताना गेल्या कित्येक दशकापासून लेखापरीक्षण झाले नसल्याचे पुढे आले आहे. आता ग्रामपंचयतीचे लेखापरीक्षण वेळेत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कुबड्यांचा आधार घेतला जाणार आहे. त्यासाठी दोन विस्तार अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत.
पंचायत राज व्यवस्थेत पायाभुत घटक असलेल्या ग्रामपंचायतींना ७३ व्या घटना दुरूस्तीने मोठ्याप्रमाणात निधी प्राप्त होतो. मुबंई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५७ नुसार ग्रामपंचायतीच्या निधीचे लेखापरीक्षण करण्याचा अधिकार कलम ३ (अ-२) नुसार संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षकांना आहेत. मात्र स्थानिक निधी लेखापरीक्षकांकडून वेळेत अनेक ग्रामपंचायतीने लेखापरीक्षण करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांच्या खर्चाचा ताळमेळ नाही. लेखापरीक्षणासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. लेखापरीक्षणाच्या सुधारीत कार्यपध्दतीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी लेखापरीक्षणाचा अनुभव असलेले दोन विस्तार अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यांना जिल्ह्यातील सहाय्यक संचालक आणि स्थानिक निधी लेखा यांच्याकडे वर्ग केले जाणार आहे. ग्रामपंचायतीचे रखडलेले लेखापरीक्षण अद्ययावत हाईपर्यंत किमान एक वर्षासाठी या अधिकाऱ्यांना लेखापरीक्षणाचीच जाबाबदारी पार पाडावी लागणार आहे. लेखापरीक्षणात सर्वात मोठी अडचण ही लेखे वेळेत उपलब्ध होत नाही.
ग्रामसेवकांनी हे अभिलेखे वेळेत उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. आता गटविकास अधिकाऱ्यांना देखिल ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी यांच्या मासिक बैठकीत लेखापरीक्षणासाठी अभिलेख्यांचा आढावा घेणे बंधनकारक केले आहेत. अभिलेखे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकावर निधी लेखापरीक्षा अधिनियम २०११ च्या कलम आठ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे, असा आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव वैभव राजेघाटगे यांनी दिला आहे.
प्रत्यक्षात ग्रामपंचायत लेखापरीक्षणात सुधारणेसाठी जिल्हा परिषदेची मदत कितपत होते, हे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय अनेक ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतींचा प्रभारच हस्तांतरित केला नाही. काहींनी तर चक्क अभिलेखे गायब केले आहेत. अशा ग्रामसेवकांना वठणीवर आणण्याचे आव्हान ग्राम विकास विभागासमोर आहे. त्यानंतरच ग्रामपंचायत कारभारात खऱ्या अर्थाने पारदर्शकता येणार आहे.