शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

१४ कोटींच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: December 23, 2016 02:05 IST

जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता पाहता पदाधिकाऱ्यांनी

जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांना प्रतीक्षा ‘डीपीसी‘कडून निधी मिळण्याची
यवतमाळ : जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता पाहता पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीकडून विकास निधी मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. सुमारे १४ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली असून आता ते निधीबाबत काय निर्णय घेतात याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेने काही महिन्यांपूर्वी १८ कोटी रुपयांच्या विकास कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केले होते. अनेक महिने हे प्रस्ताव पडून राहिले. दरम्यान या प्रस्तावांना सर्वसाधारण सभेची मान्यताच नसल्याची बाब पुढे आल्याने हे प्रस्ताव परत पाठविले गेले. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. आता हे प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठविले गेले आहेत. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी मिळतो का याकडे नजरा लागल्या आहेत. नियोजन विभागाने हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेने ३०५४ या हेडवर १२ कोटी तर ५०५४ या हेडवर सहा कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केले होते. यातील १२ कोटींपैकी तीन कोटी ७४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मात्र उर्वरित सुमारे १४ कोटींचे प्रस्ताव ‘डीपीसी’कडे पडून होते. ‘लोकमत’ने या संबंधीचे वृत्तही प्रकाशित केले होते. अखेर ९ डिसेंबर रोजी या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. परंतु आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर निधी दिला जाईल का याबाबत साशंकता आहे. १४ कोटींची ही कामे वेगाने मार्गी लावण्याचा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. या कामांवर त्यांचे ‘अर्थकारण’ अवलंबून असल्याचे बोलले जाते. म्हणूनच त्यांच्या निधी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे नजरा लागल्या आहेत. १८ कोटींमध्ये रस्ते, पूल या सारखी सुमारे दीडशे कामे आहेत. यातील कामांची विभागणी मजूर कामगार सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संस्था आणि खुल्या निविदा यामध्ये होणार आहे. निधी मंजूर झाला तरी प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेला अवधी लागणार असला तरी त्या आधी या कामांचे वाटप करता येते का या दिशेने पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

तीर्थक्षेत्र विकासाचे पावणे चार कोटी
जिल्हा नियोजन समितीमधून तीर्थक्षेत्र विकासासाठी पावणे चार कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला मिळणार आहे. यातील २२ लाख रुपये मंजूर केले गेले आहे. उर्वरित निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरात देण्यात आली आहे. या निधीतून मंदिर, सभागृह, मंदिराची दुरुस्ती, कंपाऊंड, जोडरस्ते या सारखी कामे घेतली जाणार आहेत.