परतीच्या पावसाने बसला सोयाबीनला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:16+5:30
हे सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र दररोज पाऊस बरसत आहे. यामुळे हे सोयाबीन सोंगणी करण्याचे शेतकºयांनी टाळले आहे. यामुळे उभ्या झाडांना असलेल्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहे. यामुळे अशा सोयाबीनची गुणवत्ता घसरण्याचा धोका वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठी तारांबळ उडविण्यास सुरूवात केली आहे. अपुऱ्या पावसावर मात करणारे बियाणे काही शेतकऱ्यांनी पेरले आहे. असे सोयाबीन काढणीला आले आहे. याच सुमारास परतीचा पाऊस बरसत आहे. यामुळे परिपक्व शेंगांचे टरफल काळे पडून शेंगातून कोंब बाहेर पडत आहेत. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
जिल्ह्यात यावर्षी दोन लाख ६७ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. यावर्षी हवामान खात्याने अपुरा पाऊस पडण्याचा अंदाज पेरणीपूर्वी जाहीर केला. याच अंदाजाचा धागा पकडत काही शेतकऱ्यांनी कमी पावसात हातात येणारे सोयाबीनचे वाण पेरले. अर्ली व्हेरायटी म्हणून असे वाण बाजारात प्रसिध्द आहे.
प्रारंभी उशिरा आणि अपुरा पाऊस आला. यामुळे पुढे पाऊस बरसणारच नाही. अशा अंदाजात अनेक शेतकºयांनी अर्ली व्हेरायटी शेतशिवारात लावली आहे.
हे सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र दररोज पाऊस बरसत आहे. यामुळे हे सोयाबीन सोंगणी करण्याचे शेतकºयांनी टाळले आहे. यामुळे उभ्या झाडांना असलेल्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहे. यामुळे अशा सोयाबीनची गुणवत्ता घसरण्याचा धोका वाढला आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना निसर्गाकडे साकडे घालण्याशिवाय पर्यायच शिल्लक नाही. शेतकरी आपले पीक वाचविण्यासाठी निसर्गाला प्रार्थना करीत आहे.
काढणी आणि संरक्षण महत्त्वाचे
अर्ली व्हेरायटीमधील काढणीला आलेले सोयाबीनचे पीक निरभ्र वातावरणाचा अंदाज घेऊन सोंगावे लागणार आहे. त्याच्या संरक्षणासाठी ताडपत्रीची व्यवस्था करावी लागणार आहे. तर जे पीक परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे, अशा सोयाबीनच्या शेंगावर सततच्या पावसाने बुरशी पडण्याचा धोका आहे. बिजोत्पादनाचा प्लॉट असणाºया शेतकºयांनी अशा सोयाबीनवर बुरशीनाशकाची फवारणी करावी. यामुळे त्यांचा प्लॉट फेल होणार नाही. अशा सोयाबीनची उगवणशक्ती कायम ठेवण्यास मदत होणार आहे.
शेतकºयांनी हवामानाचा अंदाज घेऊनच अर्ली व्हेरायटीचे सोयाबीन काढावे. तर इतर सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने तयारी करावी. त्यावर बुरशीजन्य किडीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ