शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
4
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
5
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
6
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
7
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
8
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
9
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
10
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
11
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
12
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
13
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
14
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
15
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
16
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
17
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
18
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
20
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

साखरावासींचा पाण्याचा ताळेबंद

By admin | Updated: June 28, 2014 01:42 IST

साखरावासीं पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या ताळेबंदानुसार करणार पिकांचे नियोजन.

वाशिम : आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यक्रमांतर्गत ग्राम साखरा येथे कृषी मित्र बहुउद्देशीय संस्था बोराळाच्यावतीने पाण्याचा ताळेबंद जाहीर करण्यात आला आहे. या गावाचे शेतकरी पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करणार आहेत.
या गावाचा उपलब्ध पाणी साठा ८८.५७ कोटी लिटर आहे; परंतु अनाठायी वापरामुळे ३८.४७ कोटी लिटर पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे या गावाला दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा, मोहीम राबविणे व पिकांचे व्यवस्थित नियोजन करण्याचा उपाय योग्य असल्याचे कृषी मित्र संस्थेने ताळेबंदावरुन सुचविले आहे. त्यामुळे साखरा गावचे शेतकरी यंदा पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करीत आहेत.
कृषी मित्र संस्थेचे अध्यक्ष आर.आर.वानखेडे व सचिव नारायण महाले यांनी साखरा गावाचा पाण्याच्या ताळेबंद घोषित केला आहे. त्यानुसार साखरा गावाचे भौगोलिक क्षेत्र ७२१.६४ हेक्टर असून, गावठाणचे क्षेत्र १.२0 हेक्टर आहे.
गावातील लोकसंख्या १00३ आहे. जनावरांची संख्या ३३४ व सरासरी पर्जन्यमान ७५0 मि.मि. आहे. गावठाणात पडणारा पाऊस १ कोटी लिटर आहे तर गावशिवारात ३९२.१३ कोटी लिटर पाणी पडते. लघुसिंचन तलावपाझर तलाव, नाला, सिमेंट बंधारे आदी स्त्रोतांद्वारे भूजलात रुपांतरीत होणारा साठा १.९८ कोटी लिटर आहे. गावाच्या लोकांच्या पिण्यासाठी व वापरण्यासाठी १.८३ कोटी लिटर वापरले जाते. जनावरांसाठी २.११ कोटी लिटर पाणी वापरले जाते. शेती वर्गवारीनुसार शेतीसाठी ११.८१ कोटी तर २२ कोटी लिटर पाणी बिगर शेती कामांसाठी वापरले जाते.
पाणी ३५ टक्के १0६.६६ कोटी लिटर अर्थात ३५ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते तर जमिनीवर शेवटपर्यंत साठून राहणारे पाणी पाच टक्के अर्थात २९.५२ कोटी लिटर आहे.
गावातील नळपाणी पुरवठा, विहिरी, हातपंप, विद्युत पंप, सार्वजनिक विहिरी अशा स्त्रोतांपासून १.९७ कोटी लिटर पाणी उपलब्ध होते. अशा प्रकारे एकूण ८८.४७ कोटी लिटर पाणी उपलब्ध होत असताना त्याचा अनाठायी वापर केला जात असल्याने ३८.४७ कोटी लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण होतो.
त्यामुळे गावाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी यावर्षी पावसाळय़ात कमी पाण्यावर वाढणारी पिके घेऊन तुषार व सूक्ष्म सिंचनाचा वापर करुन व विहिरींचे पुनर्भरण करण्याचा निर्धार साखराच्या ग्रामस्थांनी व शेतकर्‍यांनी केला आहे.