शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पैनगंगेच्या पुरामुळे तुटला १० गावांचा संपर्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 2:46 PM

पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव या धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव या धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडले जात असून यामुळे नदीला शनिवारी व रविवारी मोठा पूर आला. त्याने वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील १० गावांचा संपर्क तुटला. तसेच शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीन सुड्याही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वाशिम जिल्ह्यात अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत आहे. अवकाळी स्वरूपातील या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबिन, तूर, कपाशी या पिकांची प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. याशिवाय फळबागांनाही जबर फटका बसला आहे. यामुळे जिल्हाभरातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरते संकटात सापडले आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण आणि बाधीत पिकांचे पंचनामे करण्याचे काम महसूल, कृषी विभागासह प्रशासनातील अन्य यंत्रणांकडून केले जात आहे. अशातच वाशिम जिल्ह्याला लागून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातही धुवाँधार पाऊस होऊन पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव ही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने त्याचे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आल्याने शनिवारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहिली. यामुळे नदी काठावर वसलेल्या रिसोड तालुक्यातील वाकद, गोहोगाव, महागाव, बाळखेड, सरपखेड, पेनबोरी, धोडप बु., धोडप खु., देगाव, रिठद यासह अन्य काही गावांमधील शेतशिवारांमध्ये पुराचे पाणी शिरले. शेतांमध्ये शेतकऱ्यांनी रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्या वाहून गेल्या. यासह शेकडो हेक्टर शेतजमिनीवरील सुपीक माती वाहून गेली. पुरामुळे शनिवारी दिवसभर आणि रविवारी सायंकाळपर्यंत दहा गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क पुर्णत: तुटला होता. रात्रीच्या सुमारास पुराचे पाणी ओसरल्यानंतर विस्कळित झालेले जनजीवन पुर्वपदावर आले; मात्र तोवर शेतशिवारांमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी अधिकच हतबल झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील धरणांमधून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरात शेतांमध्ये उभी असलेली तूर आणि हळद या पिकांना जबर फटका बसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात २७ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात असतानाच आता पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामेही करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी बाधीत शेतकºयांमधून जोर धरत आहे.अवकाळी पावसामुळे बाधीत झाली ८०२ गावे; २११ गावांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण!जिल्ह्यात गत काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ८०२ गावे बाधीत होऊन सोयाबिन, तूर, कपाशी या पिकांसोबतच फळबागा व काहीठिकाणी फुलपिक व भाजीपाला पिकांची जबर हानी झाली. दरम्यान, प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीची पाऊले उचलत ३ नोव्हेंबरपर्यंत २११ गावांमधील ५७ हजार ७३८ शेतकºयांच्या शेतातील नुकसानाच्या पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. त्याच्या याद्या ४० ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध देखील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमriverनदीfloodपूर