शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पाण्याच्या ‘व्यावसायिकरणा’चा वसई-विरार पालिकेला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 8:39 AM

टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत.

विरार/नालासोपारा : वसई-विरार शहराच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत असून येथील लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना होणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागला असून याचा अचूक फायदा घेत टँकर व्यावसायिकांनी वसई-विरारमध्ये आपले बस्तान घट्ट बसविले आहे. पाणी विक्रीतून या लाॅबीला लाखो रुपयांचा नफा होत असताना महापालिकेला मात्र कराचे पैसेही मिळत नसल्याने मोठा फटका बसत असल्याचे उघड झाले आहे.टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत. या व्यवहारातून वार्षिक अंदाजे १५० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.मागील दहा ते पंधरा वर्षांपासून येथील टँकरमालक बिनदिक्कतपणे पाण्याची लूट करून त्यातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ घेत आहेत. तरीही आजपर्यंत पालिकेकडून यांच्यावर कोणतीही कर आकारणी केली गेलेली नाही.वसई-विरार महापालिका हद्दीतील नैसर्गिक पाण्याचे हे बाजारीकरण जोरात सुरू असून या व्यावसायिकांवर पाालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे महापालिका अधिनियम १३० अंतर्गत टँकर व्यावसायिकांना तसेच बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्यांना पाणी लाभ कर आकारला जावा, अशी मागणी केली जात आहे. वसई-विरार महानगरपालिकेने  अनधिकृतरीत्या पाणीविक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारून टँकर व्यावसायिकांसह बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या पाणी लाभ श्रेणीत आणून महापालिकेच्या महसुलात वाढ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे.

१२०० रुपयांची गुंतवणूक, २४ हजारांचा नफा!बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तर सगळ्याच सीमा पार करून २० लीटरचा पाण्याचा बाटला सरासरी ४० रुपयांना विकण्यास सुरुवात केली आहे. १२०० रुपयांना मिळणाऱ्या १२ हजार लीटर पाण्याच्या एका टँकरचे पाणी शुद्धीकरण करून पिण्यास योग्य असल्याचा बनाव करून त्यातून तयार होणारे सहाशे बाटलीबंद डबे विकून हे पाणी विक्रेते सरासरी २४ हजार रुपयांचा भरघोस नफा एका टँकरमागे प्रतिदिन कमवत आहेत. या व्यवहारातून दरवर्षी ८०० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होत असल्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी