शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार पट्ट्यात चाळमाफीयांचा जोर

By admin | Updated: July 7, 2015 23:11 IST

जिल्हापरिषद, पंचायत समिती पाठोपाठ महानगरपालिका निवडणुकांमुळे अनधिकृत बांधकाम विरोधातील मोहिम ठप्प झाली होती. यासंधीचा फायदा घेत वसई, विरार, नालासोपारा व अन्य भागात चाळमाफीयांनी पुन्हा डोके वर काढले.

वसई : जिल्हापरिषद, पंचायत समिती पाठोपाठ महानगरपालिका निवडणुकांमुळे अनधिकृत बांधकाम विरोधातील मोहिम ठप्प झाली होती. यासंधीचा फायदा घेत वसई, विरार, नालासोपारा व अन्य भागात चाळमाफीयांनी पुन्हा डोके वर काढले. आजवर तोडण्यात आलेली अनेक बांधकामे पुन्हा डौलात उभी राहिली आहेत. कार्यवाहीमध्ये शिथीलता आल्यामुळे भविष्यात अधिकाधिक अनधिकृत बांधकामे होण्याची भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.वसई विरार उपप्रदेशाला अनधिकृत बांधकामाचा विळखा पडला आहे. आजमितीस या उपप्रदेशात सुमारे १ लाखावर अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने ३ वर्षापूर्वी मोहिम राबवण्यास सुरूवात केली. या मोहिमेच्या माध्यमातून सुमारे ७ ते ८ हजार अनधिकृत बांधकामे उध्वस्त करण्यात आली. परंतु गेल्यावर्षी लोकसभा त्यानंतर विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती, सहकारी बँका व नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुका यामुळे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ही मोहिम स्थगित करण्यात आली.या परिस्थितीचा फायदा घेत भूमाफीया व चाळमाफीयांनी पुन्हा डोके वर काढले व अवघ्या ३ ते ४ महिन्यात हजारो बांधकामे पुन्हा उभी राहिली. चाळमाफीया पुन्हा सक्रीय झाल्यामुळे गरजू नागरीकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.अशी होते फसवणूकबांधकाम सुरू होण्यापूर्वीच महानगरपालिकेने बांधकामाची संपुर्ण कागदपत्रे तपासून ही कामे रोखल्यास सर्वसामान्यांची फसवणूक होणार नाही असे नागरीकांचे म्हणणे आहे. परंतु या बांधकामांना वीज, पाणी व सर्वसुविधा त्वरीत उपलब्ध होत असल्यामुळे नागरीकांची फसवणूक होत असते.

काही चाळमाफीयांनी अनधिकृत बांधकामे असतानाही महानगरपालिकेची मंजुरी असल्यासंदर्भातील निळ्या रंगाचे फलकही लावले आहेत. वास्तविक असा गैरप्रकार करणाऱ्यांवर महानगरपालिका प्रशासनाने महाराष्ट्र प्रादेशिक शहर नियोजन अंतर्गत (एमआरटीपी) कारवाई करायला हवी असे फसगत झालेल्या सुधाकर साळवी यांचे म्हणणे आहे.

सध्या नालासोपारा पूर्व भागातील तुळींज, संतोषभुवन, धानीवबाग, पेल्हार, विरार येथे चंदनसार, कोपरी, शिरसाड, वसई येथे सातिवली, वालीव, कामण, चिंचोटी, पोमण व कोल्ही ही सर्व गावे अनधिकृत बांधकामासाठी प्रसिद्ध आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी अनधिकृत गोदामे बांधणारे एक रॅकेट सक्रीय असून त्यामध्ये परप्रांतीयांचा समावेश आहे. ही गोदामे भाड्याने नावाजलेल्या आॅटोमोबाईल कंपन्यांना देण्यात येतात. तर काही हॉटेलमालकांनी आपल्या हॉटेलमध्ये सरसकट अनधिकृत बांधकामे केली आहेत.