शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
3
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
4
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
5
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
6
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
7
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
8
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
9
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
10
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
11
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
12
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
13
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
14
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
15
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
16
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
17
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
18
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
19
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

डहाणूतील साडेतीनशे अंगणवाड्या नळजोडणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 11:45 PM

मुलांना शुद्ध पाणी मिळणे आवश्यक : उन्हाळ्यात होणार वणवण

अनिरुद्ध पाटील  लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी : मार्च महिना सुरू होत नाही तोच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. आगामी तीन महिने  पाणीटंचाईचा प्रश्न अधिक भेडसावणार आहे. तालुक्यातील जवळपास साडेतीनशे अंगणवाडी केंद्रांना तर अद्याप नळजोडण्याच मिळालेल्या नसल्याने त्यांच्यावर येत्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष बालके अंगणवाड्यांत येत नसली तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणीचा मुद्दा चर्चेला आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या आतील बालकांना बालशिक्षणाचे धडे अंगणवाडी केंद्रातून दिले जातात. त्यांचा सर्वांगीण विकास साधताना, सर्व सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. केंद्राच्या इमारतीपासून आहार, पिण्याचे पाणी इ. मिळणे आवश्यक आहे. तालुक्यात डहाणू आणि कासा येथे दोन एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालये आहेत. त्याअंतर्गत मुख्य आणि मिनी अशा एकूण ४०८ अंगणवाड्या आहेत. सध्या अंगणवाडी केंद्रे सुरू असली, तरी लाभार्थी बालके प्रत्यक्ष केंद्रात येत नाहीत. आठवड्यातून एक दिवस लाभार्थ्यांच्या पालकांना केंद्रात बोलावून आठवड्याचा आहार दिला जातो. दरम्यान, तालुक्यातील बहुतेक अंगणवाडी केंद्रांत नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सोय अद्याप झालेली नाही. ४०८ पैकी ५९ अंगणवाडी केंद्रांना नळ पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे. ११५ केंद्रांत हातपंप, १६० ठिकाणी बोअरवेल, ६० केंद्रांवर विहिरीद्वारे पाणीपुरवठा होतो. तर आजही ५१ केंद्रांची भिस्त सार्वजनिक नळ पाणीपुरवठ्यावर आहे. यापैकी ३८ केंद्रांवर पाणी साठवण टाकी आहे. तर ३७० केंद्रांवर पाण्याची टाकीही नाही.

कुपोषणाचा प्रश्न आजही गंभीरडहाणू, मोखाडा, तलासरी, जव्हार या आदिवासीबहुल तालुक्यांत आजही कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. कुपोषणाच्या भस्मासुराला दूर पळवायचे असल्यास प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर शुद्ध पाणीपुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.