शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रकात करवाढ नाही

By admin | Updated: February 25, 2015 22:50 IST

वसई विरार शहर मनपाचा २०१५-१६ चा आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. त्यात कोणतीही करवाढ नसून

वसई : वसई विरार शहर मनपाचा २०१५-१६ चा आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. त्यात कोणतीही करवाढ नसून शिल्लक मात्र ३७ कोटी ५७ लाख रू. आहे. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे कर आणि दरवाढीचा बोजा सर्वसामान्य करदात्यांवर पडू नये याची काळजी घेण्यात आली आहे. एकूण २३७४ कोटी ५८ लाख रू. जमा तर २३३७ कोटी ५७ लाख खर्च दाखवण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प महासभेसमोर येणार असून त्यावर चर्चा झाल्यानंतर तो मंजूर करण्यात येणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा व अन्य नागरीसुविधा ४१८ कोटी, दिवाबत्ती व्यवस्था २५ कोटी, स्वच्छता व साफसफाई १३९ कोटी, अग्नीशमन ३१ कोटी, बांधकाम १ हजार ७ कोटी अशा या तरतूदी आहेत. थकीत कर वसूल करण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात येणार आहे. ५ वर्षाचा कर एकाच वेळी भरणा केल्यास १५ टक्क्याची सवलत देण्यात येणार आहे. करवसूलीचे इष्टांक गाठता न आल्यामुळे करदात्यासाठी ही योजना अंमलात आणणार आहेत. सदर अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी अवधी मागितला, पण त्यास नकार देण्यात आल्यामुळे विरोधी पक्ष नेते विनायक निकम, संजय कोळी व राजन पाटील यांनी सभात्याग केला. गेल्या आर्थिक वर्षात कोणत्याही योजना अंमलात येऊ शकल्या नाहीत. या योजनांचा अर्थसंकल्पामध्ये कोणताही उल्लेख नसल्यामुळे या योजना गुंडाळण्यात आल्या का? असा प्रश्न करदात्यांना पडला आहे. डहाणू तालुक्यात सुसरी नदीवर अतिरीक्त पाणीपुरवठा योजना प्रकल्प राबवण्यासंदर्भात तसेच अन्य योजनांची सद्यस्थिती याबाबत कोणतेही आकलन त्यामुळे नगरसेवक व जनतेला होत नाही, असा आक्षेप आहे. (प्रतिनिधी)