शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘ती’ हत्या भंगाराच्या पैशांच्या वादातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 1:57 AM

चार आरोपींना मुंबईच्या कांदिवलीतून अटक : अपघाताचा केला होता बनाव

नालासोपारा : रविवारी रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे गावाच्या हद्दीत गोणीमध्ये हत्या करून भरलेला मृतदेह सापडला होता. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास करत ३६ तासांच्या आत ओळख पटवून अपघाताचा केलेला बनाव उघड करून पैशांच्या वादातून झालेल्या हत्येचा छडा लावून चार आरोपींना अटक केली आहे.

वालीव पोलिसांनी या प्रकरणी तीन टीम तयार केल्या होत्या. वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय या परिसरातील मिसिंग, अपहरण असलेल्यांचा शोध घेत कौशल्याने तपास करून कांदिवली पूर्व येथे राहणारे पारस गुप्ता (४५) हे मिसिंग असल्याचे समतानगर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाली. त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क केल्यावर हत्या झालेले पारस गुप्ता असल्याचे निष्पन्न झाले. ओळख निष्पन्न झाल्यावर या गुन्ह्याचा तांत्रिकदृष्ट्या व गुप्त माहितीदाराच्या आधारे तपास करत कांदिवलीतून ओमप्रकाश अंजारीरामजी बिष्णोई (२१), सुरेशकुमार कृष्णाराम बिष्णोई (२१), सुरेशकुमार नारायणराम बिष्णोई (२५) आणि भवरलाल चेनाराम बिष्णोई (३८) यांना बुधवारी अटक करण्यात आली. गुप्ता यांच्याकडून ओमप्रकाश याला भंगाराच्या उधारीचे पैसे घेणे बाकी असल्याने झालेल्या वादातून लाकडी दांडग्याने डोक्यात व मानेवर मारून ठार मारले. हत्या केल्यानंतर पोलिसांची व लोकांची दिशाभूल करण्यासाठी बाजूला पडलेले केमिकल आजूबाजूला टाकून घटनेवेळी अपघात झाल्याचा बनाव उघड केला. ही घटना लपवण्यासाठी चारही आरोपींनी आपसात संगनमत करून मृतदेह गोणीमध्ये भरून स्वतःच्या इको चारचाकी गाडीत भरून बाफाणे येथे फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे करत आहेत.

हत्या केल्यावर मृतदेह गोणीमध्ये भरून फेकलेला सापडल्यावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात चार आरोपींना अटक केली असून वसई न्यायालयात हजर केल्यावर सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार