शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

वसई तहसीलदारांना पदमुक्त करा; काँग्रेसचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:54 IST

वसईत एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन; मुख्यमंत्र्यांनाही दिले निवेदन

वसई : गतिमान महसूल प्रशासन हे ब्रीद आता फक्त कागदावर राहिले असून वसईचा महसूल विभाग पुरता दिशाहीन झाला आहे. वसई तालुक्याचे तहसीलदार जनतेच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष देत नसल्याने तसेच शासनाने नेमून दिलेले दायित्वही पाळत नाही. हे महत्त्वाचे काम करण्यासाठी येथील महसूल प्रशासन असमर्थ ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई तहसीलदारांना निष्कासित करणे हाच योग्य पर्याय असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी वसईत म्हटले आहे.

विजय पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सोमवारी सकाळी वसई तहसीलदारांच्या ढिम्म कारभाराच्या विरोधात तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. या प्रसंगी वसई तहसीलदार किरण सुरवसे यांना पदावरून दूर करा, या मागणीसाठी पाटील यांनी वसई प्रांताधिकारींच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदनही दिले आहे.

दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानवनिर्मित कारणांमुळे वसईच्या शहरी तसेच ग्रामीण भागात पूरसदृश परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते. तर वसई रोड भागात अनेक जुन्या चाळी, वसाहतींच्या तळमजल्यावर पाणी साचल्याने लोकांचे संसार उघड्यावर आले. अनेक घरे व दुकानदारांचे मोठे नुकसानही झाले. यामध्ये वसई रोड भागातील नवघर पूर्व, पश्चिम भाग, दिवाणमान, सी कॉलनी आदी ठिकाणी तर आठवडाभर तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी साचून राहिले होते. गंभीर म्हणजे पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक मार्ग खुले करण्यात न आल्याने तथा सदोष नालेसफाईमुळे ही स्थिती उद्भवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.त्यात पश्चिम पट्टीत अर्नाळा, वसई कोळीवाडा येथील वाल्मिकीनगर क्षेत्र वसईचा बागायती पट्टा आधी अनेक क्षेत्रात पाणी साचल्याने सामान्य शेतकरी व जनतेचे मोठे नुकसान झाले.

या प्रकरणी वेळीच पंचनामे करण्यात यावेत तथा बाधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विजय पाटील यांनी ८ जुलै रोजी केली होती. तर यासाठी पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला तब्बल पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती.

परंतु महसूल प्रशासनाने योग्य वेळी नुकसानग्रस्तांचे पंचनामे केले असते, तर त्यांना महापालिका घरपट्टी करात सूट शासनाकडूनही नुकसान भरपाई आदी लाभ मिळणे शक्य होते. मागणी करूनही व आंदोलनाचा इशारा देऊनही वसई तहसील प्रशासनाने पंचनामे करण्याचे काम केले नाही. यामुळे विजय पाटील यांनी सोमवारी वसई तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले.

तहसीलदारांचे चर्चेचे आमंत्रणपाटील यांना चर्चेसाठी पाचारण करून पावसाळी पाणी साठवण्याचा प्रकार व अन्य मुद्याबाबत तहसीलदारांनी चर्चा केली. वसई तहसीलदार कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठ्यांची पुरेशी संख्या नसल्याने पंचनामे वेळेत होऊ शकले नाहीत तथा पंचनामे करण्याचे सोपस्कार सुरू असल्याचे तहसीलदारांनी चर्चेवेळी स्पष्ट केलं. मात्र एकूणच या सर्व परिस्थितीवर मिळालेल्या उत्तराने समाधान न झालेल्या विजय पाटील व सहकाऱ्यांनी वसई तहसीलदार यांना पदमुक्त करण्याची मागणी लावून धरली.