शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

वसई तहसीलदारांना पदमुक्त करा; काँग्रेसचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:54 IST

वसईत एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन; मुख्यमंत्र्यांनाही दिले निवेदन

वसई : गतिमान महसूल प्रशासन हे ब्रीद आता फक्त कागदावर राहिले असून वसईचा महसूल विभाग पुरता दिशाहीन झाला आहे. वसई तालुक्याचे तहसीलदार जनतेच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष देत नसल्याने तसेच शासनाने नेमून दिलेले दायित्वही पाळत नाही. हे महत्त्वाचे काम करण्यासाठी येथील महसूल प्रशासन असमर्थ ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई तहसीलदारांना निष्कासित करणे हाच योग्य पर्याय असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी वसईत म्हटले आहे.

विजय पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सोमवारी सकाळी वसई तहसीलदारांच्या ढिम्म कारभाराच्या विरोधात तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. या प्रसंगी वसई तहसीलदार किरण सुरवसे यांना पदावरून दूर करा, या मागणीसाठी पाटील यांनी वसई प्रांताधिकारींच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदनही दिले आहे.

दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानवनिर्मित कारणांमुळे वसईच्या शहरी तसेच ग्रामीण भागात पूरसदृश परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते. तर वसई रोड भागात अनेक जुन्या चाळी, वसाहतींच्या तळमजल्यावर पाणी साचल्याने लोकांचे संसार उघड्यावर आले. अनेक घरे व दुकानदारांचे मोठे नुकसानही झाले. यामध्ये वसई रोड भागातील नवघर पूर्व, पश्चिम भाग, दिवाणमान, सी कॉलनी आदी ठिकाणी तर आठवडाभर तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी साचून राहिले होते. गंभीर म्हणजे पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक मार्ग खुले करण्यात न आल्याने तथा सदोष नालेसफाईमुळे ही स्थिती उद्भवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.त्यात पश्चिम पट्टीत अर्नाळा, वसई कोळीवाडा येथील वाल्मिकीनगर क्षेत्र वसईचा बागायती पट्टा आधी अनेक क्षेत्रात पाणी साचल्याने सामान्य शेतकरी व जनतेचे मोठे नुकसान झाले.

या प्रकरणी वेळीच पंचनामे करण्यात यावेत तथा बाधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विजय पाटील यांनी ८ जुलै रोजी केली होती. तर यासाठी पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला तब्बल पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती.

परंतु महसूल प्रशासनाने योग्य वेळी नुकसानग्रस्तांचे पंचनामे केले असते, तर त्यांना महापालिका घरपट्टी करात सूट शासनाकडूनही नुकसान भरपाई आदी लाभ मिळणे शक्य होते. मागणी करूनही व आंदोलनाचा इशारा देऊनही वसई तहसील प्रशासनाने पंचनामे करण्याचे काम केले नाही. यामुळे विजय पाटील यांनी सोमवारी वसई तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले.

तहसीलदारांचे चर्चेचे आमंत्रणपाटील यांना चर्चेसाठी पाचारण करून पावसाळी पाणी साठवण्याचा प्रकार व अन्य मुद्याबाबत तहसीलदारांनी चर्चा केली. वसई तहसीलदार कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठ्यांची पुरेशी संख्या नसल्याने पंचनामे वेळेत होऊ शकले नाहीत तथा पंचनामे करण्याचे सोपस्कार सुरू असल्याचे तहसीलदारांनी चर्चेवेळी स्पष्ट केलं. मात्र एकूणच या सर्व परिस्थितीवर मिळालेल्या उत्तराने समाधान न झालेल्या विजय पाटील व सहकाऱ्यांनी वसई तहसीलदार यांना पदमुक्त करण्याची मागणी लावून धरली.