शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार तालुक्याचे बीएसएनएल कार्यालय झाले भंगार

By admin | Updated: December 25, 2016 00:15 IST

येथील बी.एस.एन.एल. कार्यालयाची अक्षरश: भंगार अवस्था झाली असून गेल्या २५ वर्षापासून जुन्या यंत्रणेलाच थिगळे लाऊन काम भागवले जाते आहे. या भंगार यंत्रणांद्वारे

- हुसेन मेमन,  जव्हार

येथील बी.एस.एन.एल. कार्यालयाची अक्षरश: भंगार अवस्था झाली असून गेल्या २५ वर्षापासून जुन्या यंत्रणेलाच थिगळे लाऊन काम भागवले जाते आहे. या भंगार यंत्रणांद्वारे काम करणे येथील कर्मचाऱ्यांचा मोठे जिकरीचे होत आहे. त्यात जव्हार येथील जे.टी.ओ.कडेच जव्हार, मोखाडा व विक्रमगडचा पदभार असल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच रिक्तपदांचा आकडा जास्त असल्यामुळे कामे कूर्मगतीने होत आहेत. एकविसाव्या शतकात डिजीटल यंत्रणा आल्या असून वायफाय (विनातार) पध्दतीने दूरसंचाराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, जव्हारमध्ये आजही २५ वर्षापूर्वीच्या यंत्रांना दुरूस्त करून कशीबशी चालविली जात आहे. येथील यु.पी.एस.च्या बॅटऱ्या पूर्णपणे निकाम्या झाल्यामुळे वीज गेल्यावर यंत्रणा बंद पडत असून परिणामी संपूर्ण सेवा कोलमडत आहे. कार्यालयात पहाणी केली असता बॅटऱ्यांना अन्य दोन बॅटऱ्या जोडून यू.पी.एस. दहा मिनिटे कसेबसे चालेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडे वर्षानुवर्षे पत्रव्यवहार करूनही कुठलीच नविन यंत्रणा दिली जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच वरीष्ठ विभागात कुठलेही प्रकरण गेले तरी त्याबाबतचे उत्तर महिना दोन महिना झाल्याशिवाय येत नाही. त्यानंतरच मिळतो नवीन फॉर्मनव्याने टेलीफोन कनेक्शन हवे असेल तर पहिले त्या भागात लाईन उपलब्ध आहे की, नाही याचा शहानिशा केली जाते. त्या नंतरच नविन कनेक्शन फॉर्म स्वीकारला जात आहे. गेल्या २५ वर्षापासूनम्हणजे कार्यालयाच्या जन्मापासून लावण्यात आलेल्या जिर्ण दूरसंचार यंत्राणांवरच काम सुरू आहे. जमिनी खालून गेलेल्या कॉपर केबलचा अक्षरश: चुरा झालेला असून ठिकठिकाणी जॉर्इंट मारून काम रेटले जात आहे. कल्याण एक्स्चेंजद्वारे चालतो कारभारजव्हारचे कार्यालय हे कल्याण एक्स्चेंजद्वारे चालविले जाते, त्यामुळे जव्हार ते कल्याण मध्ये कुठेही लाईन ब्रेक झाली की, जव्हारची यंत्रणा ठप्प होते. ब्रॉडबॅन्ड सेवाही बंद पडल्यास तिला पूर्ववत होण्यासाठी तीन चार दिवस लागतात. देयक मात्र पूर्ण महिन्याचे भरावे लागत असल्यामुळेही ग्राहकांत तीव्र नाराजी पसरली आहे.