शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू!’; पोलिसांचा खलाशांना दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 06:16 IST

स्थानिकांकडून दगडफेक, पोलिसांनी कापले ट्रॉलर्सचे दोरखंड

हितेन नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : गुजरातमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील सुमारे ५५० खलाशी कामगारांना कुणी वालीच उरलेला नाही. रात्रीच्या अंधारात गुजरातच्या स्थानिकांकडून ट्रॉलर्सवर अमानुषपणे दगडफेक केली गेली, तर त्या ट्रॉलर्सचे दोरखंड पोलिसांनी कापून त्यांना पुन्हा भुकेलेल्या अवस्थेत माघारी वेरावल बंदरात हाकलून लावले. ‘तुम्ही येथून गेला नाही, तर गोळ्या घालू’ असा दमही पोलिसांनी भरल्याचे एका कामगाराने सांगितले.
पोरबंदर, ओखा, वेरावल आदी गुजरातच्या विविध बंदरांतून ७ महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या घरी परतण्यासाठी सुमारे १ हजार ८०० खलाशी उंबरगाव येथे आल्यानंतर रविवारी फक्त गुजरात, दमण व सेलवासा येथील खलाशांना ट्रॉलर्सवरून उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून घरी पाठवण्यात आले. परंतु महाराष्ट्रातील खलाशांना उतरवण्यास गुजरात सरकार व पोलिसांनी नकार देत त्यांना जबरदस्तीने ट्रॉलर्सवर रोखले. ‘लोकमत’ने पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना मोबाईल, स्वीय सचिव, मेसेजद्वारे अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, आ. रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ.क्कैलास शिंदे आदींशी संपर्क साधून जिल्ह्यातील ५५० खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याबाबत वारंवार कळवूनही स्थानिक कामगारांना आणण्यासाठी सर्वांना अपयश आले. मोठ्या आशेने हे कामगार लोकप्रतिनिधी व प्रशासन आपल्यासाठी काहीतरी करतील अशी वाट पाहत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना दिलासा देणारा निर्णय न आल्याने त्यांचे मनोधैर्य खचले होते. यादरम्यान २-३ कामगारांना फिटही आल्याने बेशुद्धावस्थेतील कामगारांना योग्य उपचारही गुजरातच्या आरोग्य विभागाकडून न मिळाल्याने कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावून त्यांना शुद्धीवर आणण्यात आल्याची माहिती एका कामगाराने आपल्या मोबाईलवरून स्थानिकांना दिली.

पालकमंत्री ‘नॉट रिचेबल’
पालघर जिल्ह्याला उशिराने भेट देणाऱ्या कृषिमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या लेटलतीफ कारभाराचा फटका या कामगारांनाही बसला. त्यांना रविवारी कॉल करून मेसेज टाकून त्यांच्या सचिवांशी बोलून परिस्थितीचे गांभीर्य समजावूनही त्यांनी व्यवस्थेविषयी सकारात्मक निर्णय घेतला नाही. सोमवारी वसई येथे पालक मंत्र्यांशी मोबाइलवरून या परिस्थितीबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या सचिवांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.
आज अन्य राज्यातून पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी आलेल्या १५ ते २० हजार कामगारांच्या राहण्याचा, आरोग्य तपासणीचा, जेवणाचा खर्च मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन उचलीत असताना ७ महिन्यांपासून कुटुंबापासून लांब असलेल्या आणि आपल्या घरापासून १० ते १२ किमी अंतरावर थांबलेल्या ५५० स्थानिक कामगारांसाठी पालकमंत्री काहीही उपाययोजना आखू न शकल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Gujaratगुजरात