शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी बागायतदार संघटित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:55 IST

अवकाळीमुळे पालघर जिल्ह्यातील चिकू फळाचे आतोनात नुकसान : प्रश्न सोडवण्याचे आमदारांचे आश्वासन

- शौकत शेखडहाणू : अवकाळी पावसामुळे पालघरमधील चिकू बागायतदारांना मोठा फटका बसलेला असून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सोमवारी जिल्ह्यातील सर्व चिकू बागायतदारांची सभा डहाणूतील गजानन मंदिर हॉल येथे पार पडली. हक्काच्या चिकू फळाचे आतोनात नुकसान झाल्याने चिकू उत्पादकांनी संघटित होण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील मिरची, भाजीपाल्याचे उत्पादक संघटित झाले. त्यांना आमदार आनंद ठाकूर यांनी शासकीय लाभाच्या योजना मिळवून दिल्या. मात्र चिकू पिकाबाबत सरकार उदासीन आहे. चिकू उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्पादकांना संघटित होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आमदार आनंद ठाकूर यांनी केले. या वेळी चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी, सचिव मिलिंद बाफना, ज्येष्ठ बागायतदार यज्ञेश चुरी, आमदार आनंदभाई ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय म्हात्रे, प्रदीप चुरी यांच्यासह चिंचणी, वरोर, वानगाव, आसनगाव, चंडीगाव, घोलवड, बोर्डी इत्यादी गावांतील सुमारे तीनशे शेतकरी उपस्थित होते.

येत्या हिवाळी अधिवेशनात हा विषय मांडण्यात येणार आहे. चिकू उत्पादकांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटून समस्या सोडवणार आहे. चिकू विमा, नुकसान भरपाई, चिकू रोगांवरील उपाययोजना चिकू संकलन केंद्र आदी प्रश्न सोडवणार असल्याचेही आ. आनंद ठाकूर यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील खरिपातील मुख्य पीक भात, नागली, तूर, उडीद तसेच भाजीपालावर्गीय पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्याचे त्वरित सर्वेक्षण होऊन शासनाकडून मदत मिळायला हवी. कारण अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पुराचे पाणी आणि पुराबरोबर वाहून आलेली माती शिरलेली आहे. यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब जनतेवर उपासमारीची वेळ उद्भवणार आहे, असे महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी सांगितले. तसेच १२ जून आणि १३ जून रोजी आलेल्या ‘वायू चक्रीवादळा’मुळे झाडांवरील चिकूची फळे, आंबा फळे पडल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासंदर्भामध्ये कृषीमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदींना लेखी निवेदन देऊनही साधी चौकशी देखील करण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले.

पीक विम्याच्या लाभापासून वंचित

या फळाला विम्याचे कवच २०१२-१२ साली प्राप्त झाले असून यंदा व या विम्याच्या ट्रिगरमध्ये ९० टक्केपेक्षा जास्त आर्द्रता व २० मिलीमीटर पाऊस असे दुहेरी ट्रिगर ठेवल्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व चिकू बागायतदार पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खरे तर हे विम्याचे ट्रिगर ठरविताना १२ व १३ जून रोजी आलेल्या वायू चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि दि. २५ जुलैदरम्यानच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी विद्यापीठाचा अथवा संशोधन केंद्राचा एकही शास्त्रज्ञ पालघर जिल्ह्यामधील कोणत्याही तालुक्यामध्ये फिरकलेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तरी शासनाने या जिल्ह्यातील पिकांचे त्वरित सर्वेक्षण होऊन मदत मिळावी, अशी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार