शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

शासन म्हणते घरीच बसा, परंतु विजेचा ठिकाणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:57 PM

तांत्रिक बिघाड : महिनाभर विजेचा लपंडाव, नागरिक हैराण

शौकत शेखलोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, या आजाराला रोखण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत. शासनाने लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला असून, त्यासाठी प्रशासनाने संचारबंदीही लागू केली आहे. दरम्यान, उन्हाने अंगाची काहिली होत असतानाच गेल्या महिन्याभरापासून दर पाच मिनिटांनी विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरात बसलेल्या लोकांचा जीव गुदमरू लागला आहे. 

 डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील ३० ते ४० गावांमध्ये सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत.डहाणूच्या बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वानगाव या फिडर अंतर्गत ३० ते ४० गाव-खेडोपाड्याला चिंचणी सबस्टेशन अंतर्गत वीजपुरवठा केला जातो. परंतु, गेल्या महिनाभरापासून सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाच मिनिटेदेखील वीजपुरवठा सुरळीत राहात नाही. सकाळी तसेच संध्याकाळी तसेच दुपारच्या सुमारास २५ ते ३०वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे टाळेबंदी व संचारबंदीमुळे घरात असणाऱ्या लोकांना कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे घामाघूम व्हावे लागते. अखेर लोकांना नाईलाजास्तव बाहेर पडावे लागते.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच या परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात काय परिस्थिती असेल, या भीतीने ग्रामस्थ धास्तावलेले आहेत. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी केली खरी, परंतु प्रचंड उन्हाळ्यात जिवाची लाहीलाही होत असतानाच पाच मिनिटेही वीजपुरवठा सुरळीत राहात नसल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत आला आहे. पालघरच्या कार्यकारी अभियंत्यांनी या परिसरात विशेष लक्ष देऊन येथील विजेच्या जीर्ण, जुनाट तारा, कमकुवत ट्रान्सफॉर्मर, गंजलेले लोखंडी खांब, फ्यूज बॉक्स, ट्रान्सफॉर्मर ऑईलबरोबरच झंपर, मोडकळीस आलेले फ्यूज इत्यादी साहित्याच्या पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

चिंचणी आणि वरोर फिडरच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याचे परीक्षण सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसात या भागातील वीजपुरवठा सुरळीत होईल. - पी. मचिये, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, पालघर