शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

शासन म्हणते घरीच बसा, परंतु विजेचा ठिकाणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 23:57 IST

तांत्रिक बिघाड : महिनाभर विजेचा लपंडाव, नागरिक हैराण

शौकत शेखलोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, या आजाराला रोखण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत. शासनाने लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला असून, त्यासाठी प्रशासनाने संचारबंदीही लागू केली आहे. दरम्यान, उन्हाने अंगाची काहिली होत असतानाच गेल्या महिन्याभरापासून दर पाच मिनिटांनी विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरात बसलेल्या लोकांचा जीव गुदमरू लागला आहे. 

 डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील ३० ते ४० गावांमध्ये सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत.डहाणूच्या बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वानगाव या फिडर अंतर्गत ३० ते ४० गाव-खेडोपाड्याला चिंचणी सबस्टेशन अंतर्गत वीजपुरवठा केला जातो. परंतु, गेल्या महिनाभरापासून सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाच मिनिटेदेखील वीजपुरवठा सुरळीत राहात नाही. सकाळी तसेच संध्याकाळी तसेच दुपारच्या सुमारास २५ ते ३०वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे टाळेबंदी व संचारबंदीमुळे घरात असणाऱ्या लोकांना कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे घामाघूम व्हावे लागते. अखेर लोकांना नाईलाजास्तव बाहेर पडावे लागते.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच या परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात काय परिस्थिती असेल, या भीतीने ग्रामस्थ धास्तावलेले आहेत. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी केली खरी, परंतु प्रचंड उन्हाळ्यात जिवाची लाहीलाही होत असतानाच पाच मिनिटेही वीजपुरवठा सुरळीत राहात नसल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत आला आहे. पालघरच्या कार्यकारी अभियंत्यांनी या परिसरात विशेष लक्ष देऊन येथील विजेच्या जीर्ण, जुनाट तारा, कमकुवत ट्रान्सफॉर्मर, गंजलेले लोखंडी खांब, फ्यूज बॉक्स, ट्रान्सफॉर्मर ऑईलबरोबरच झंपर, मोडकळीस आलेले फ्यूज इत्यादी साहित्याच्या पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

चिंचणी आणि वरोर फिडरच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याचे परीक्षण सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसात या भागातील वीजपुरवठा सुरळीत होईल. - पी. मचिये, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, पालघर