शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
5
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
6
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
7
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
8
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
9
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
10
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
11
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
12
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
13
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
14
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
15
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
16
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
17
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
18
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
19
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
20
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाचे अधिकार मिळणार; आदिवासींवरील अन्यायासंदर्भात राज्यपालांचा पालघर दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:56 IST

रोजगार, पाणी आणि जंगलाचे कायद्याप्रमाणे जे अधिकार दिलेले आहेत, ते आदिवासींना मिळत नाहीत.

विक्रमगड : रोजगार, पाणी आणि जंगलाचे कायद्याप्रमाणे जे अधिकार दिलेले आहेत, ते आदिवासींना मिळत नाहीत. जे अधिकार आदिवासींना मिळाले आहेत, त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. वन अधिकारी मनमानी करतात. आदिवासींची शेतघरे तोडून टाकतात. त्यांना विहिरी खोदण्यास मज्जाव करतात, आदी अनेक तक्रारी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर राज्यपालांनी स्वत: पालघर जिल्ह्याचा दौरा करीत ‘आदिवासींना जंगलाचे अधिकार मिळावेत,’ अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदिवासींनी वनाचे अधिकार मिळावेत, यासाठी मंगळवारी पालघर जिल्ह्यातील काही भागांचा दौरा केला. विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा येथील डोयाचा पाडा येथे वयम् संस्थेच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील आदिवासी शेतकरी, शेतमजूर यांना वन विभागाकडून नाहक खोटे गुन्हे नोंदवून त्रास दिला जात आहे. वनखात्याने आदिवासींच्या नावे वनपट्टे नावे करून दिलेले आहेत. या वनपट्ट्यात आदिवासी आपले घर बांधणे, विहिरी खोदणे अशी कामे करत असताना या भागातील वन विभाग अधिकारी त्यांच्यावर कारवाई करीत असून गुन्हे दाखल करीत आहेत. याबाबत वयम् या संस्थेने राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर आदिवासींची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी राज्यपालांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

या वेळी राज्यपालांनी आदिवासींना व प्लॉटधारकांना कायद्याप्रमाणे जे अधिकार दिले आहेत, त्याची योग्य अंमलबजावणी करावी, अशा सूचना वन विभागाला दिल्या. ज्याप्रमाणे वन विभागाने जमीन दिल्या आहे, त्यात विहीर, घरे बांधू द्यावीत, आदिवासींवर कोणतीही कार्यवाही करू नये अशा सूचना राज्यपालांनी वन विभागाला दिल्या आहेत. तसेच कायद्यात काही अडचण निर्माण होत असल्यास केंद्र सरकार व राज्य सरकार सहकार्य करील, असेही आश्वासन या वेळी राज्यपालांनी दिले.

वनपट्टेधारकांनी या वनाचे रक्षण करावे व वन उत्पादने वाढवून रोजगार, शिक्षण याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. केंद्र सरकार व राज्य सरकार आपल्या हिताचे सरकार आहे. आपल्या भविष्यासाठी वीज, घर, गॅस, शौचालय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. त्यामुळे कोणत्याही समस्येचे निराकारण करण्यासाठी स्वत: लक्ष देईन, असे आश्वासन या वेळी राज्यपालांनी दिले. या वेळी वयम् संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची पाहणी केली.

डोयापाडा येथील कार्यक्रमासाठी राज्यपाल येत असताना मार्गावरील जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, सर्वश्री उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, विकास गजरे, अर्चना कदम, संदीप पवार, संजय अहिरे आदी विविध विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

आदिवासींचे मागण्यांचे निवेदन

राज्यपालांना दिलेल्या निवेदनात वन अधिनियम १९२७ चे अनुसूचित विभागात बदल करून ग्रामसभांना अधिकार द्या, गावठाण विस्तार योजना कार्यान्वित करा, वन जिल्हा समितीचे दावे जलदगतीने निकालात काढा, आदिवासींवर खोटे गुन्हे नोंदविले आहे ते परत घ्या, अशा मागण्यात केल्या आहेत.

राज्यपालांच्या दौऱ्यात प्रशासन मात्र सज्ज दिसून आले. एका दिवसात रस्ते डांबरीकरण, शाळांना रंग, परिसरात स्वच्छ झाला. त्यामुळे असे दौरे नेहमी व्हावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी कृष्णा भवनामृत संघाच्या आश्रमास भेट देऊन सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीpalgharपालघरMaharashtraमहाराष्ट्र