शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये निवडणुकांची रणधुमाळी

By admin | Updated: April 9, 2016 02:05 IST

विक्रमगड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रमुख पक्षांमध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपा, परुळेकर मंच, मनसे, बविआ, शिवसेना व अपक्ष आदी

तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रमुख पक्षांमध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपा, परुळेकर मंच, मनसे, बविआ, शिवसेना व अपक्ष आदी मिळून ७२३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत़ येत्या १७ एप्रिलला निवडणूक होत असल्याने आता उमेदवारांना प्रचारासाठी अवघा एक आठवडाच मिळणार आहे़ त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागले असून उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे़ त्यासाठी उमेदवार आपल्या पॅनलसह मतदारांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करताना दिसत आहेत़ या निवडणुका विक्रमगड तहसीलदार कार्यक्षेत्रातील तलवाडा, विक्रमगड या मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये होत आहेत़ तालुक्याच्या राजकारणातील प्रमुख पक्षांमध्ये भाजपा-शिवसेना, माकपा, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी हे मोठे आहेत. पक्षीय ताकद कितीही असली तरी यापूर्वी निवडून दिलेल्या उमेदवारांनी ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये किती विकासकामे केली आहेत, यावरही सारे काही अवलंबून राहणार आहे़ तालुक्यातील केगवा-बालापूर ग्रामपंचायतीमधील एकूण १३ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील ६ जागा या केगव्यामध्ये येत असल्याने वॉर्ड क्र-१ अ मधून अ.ज. महिला पिंकी मगन मालकरी व ज्योती यशवंत भावर, तर वॉर्ड क्ऱ २ ब मधून अ.ज. महिला अस्मिता नवशा लहांगे बिनविरोध निवडून आल्या आहेत.>वसईमध्ये ११ ग्रामपंचायतींसाठी २६८ उमेदवार रिंगणातवसई : तालुक्यातील एकूण ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १४४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २६८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. येत्या १७ एप्रिलला मतदान होणार असून आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.वसई तालुक्यातील पोमण, चंद्रपाडा, खानिवडे, शिवणसई, उसगाव, शिरवली, मेढे-वडघर, आडणे-भिनार, माजिवली-दापिवली, सकवार आणि कळंभोर या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १७ एप्रिलला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १४४ उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर, ४ जागांवर बिनविरोध निवड झाली. आता २६८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये बहुजन विकास आघाडीविरुद्ध शिवसेना-भाजपा यांच्यात सामना होणार आहे. तर, काही ग्रामपंचायतींमध्ये श्रमजीवी संघटना ताकदीनिशी उतरली आहे.