शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

Coronavirus : दुबईवरून आलेले ‘ते’ सहा जण देखरेखीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:36 AM

दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

पालघर : पालघर शहरात दहा दिवसांपूर्वी दुबईवरून आलेल्या एकूण सहा नागरिकांचा शोध घेण्यात आरोग्य यंत्रणेला आज उशिराने यश आले असून त्यांची तपासणी करून त्यांना आपल्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये ताप, खोकला, सर्दीसारखी लक्षणे आढळली असून, त्यांच्या रक्ताचे नमुने उद्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. डॉ. पाटकर गल्लीत त्यातील एक व्यक्ती सापडल्यानंतर त्यांच्या तपासणीत कोरोनाबाबत कुठलीही लक्षणे आढळून आली नव्हती. त्यांच्या घरातील अन्य सर्व लोकांची तपासणी या वेळी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. त्या व्यक्तीसोबत अन्य ६ ते ७ लोक दुबईवरून पालघरमध्ये आल्याची माहिती कळल्यानंतर त्यांचा पत्ता माहीत नसल्याने त्यांचा शोध घेत त्यांच्या तपासणीचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले होते. शेवटी डॉ. सागर पाटील आणि त्यांच्या पथकाने दुबईवरून आलेल्या अन्य पाच लोकांचा शोध घेण्यास यश मिळविले. त्यांच्या तपासणीदरम्यान त्यांच्यात ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे आढळून आली असून त्यांच्या रक्ताचे नमुने ग्रामीण रुग्णालयात घेऊन ते तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना कोरोना विषाणूची लागण झाले की नाही हे नक्की होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.जिल्ह्यातून वाडा येथील दोन रुग्णांपैकी एका रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांच्यात कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे दिसून आली नसल्याचा (निगेटिव्ह) अहवाल प्राप्त झाल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकल्याची माहिती डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाpalgharपालघर