शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण

By admin | Updated: May 18, 2014 23:51 IST

येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांची पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळत नाही.

 गिरड : येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांची पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळत नाही. याला स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. निधी उपलब्ध असतानाही काम होत नाही, यामुळे असंतोष आहे. ग्रामसभेत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. याबाबत वृत्त असे की, १२ मे ला ग्रामसभा झाली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रा. प. प्रशासनासमोर प्रामुख्याने ही समस्या मांडली. गत पाच वर्षापूर्वी फिल्टर प्लॉन्ट पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. यानंतर बांधकाम सुरू झाले. मात्र हे काम कासवगतीने सुरू असल्याने अद्याप नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होत नाही. जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी कामाची पाहणी करुन काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. परंतु या आदेशाला स्थानिक प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जाते. काम अपूर्ण असल्याने अजुनही पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. येथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे फिल्टर प्लॉन्टचे काम कधी पूर्ण होईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)