शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे काम जाणार पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

वर्धा-यवतमाळ या ७८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेकामाच्या प्रगतीचा आढावा खासदार रामदास तडस यांनी घेतला. यावेळी भूसंपादन अधिकारी सुनील कोरडे, मध्ये रेल्वे विभागचे उपअभियंता एच. एल. कावरे, एम. एम. सत्यमूर्ती, बालमोमुद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यातील वर्धा-नांदेड रेल्वे लाईनकरिता ४८.४८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करावयाची होती.

ठळक मुद्देवर्धा ते यवतमाळ पहिल्या टप्प्याचे ६० टक्के काम पूर्ण , मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब ४० किलोमीटर व कळंब ते यवतमाळ ३८ किलोमीटर, वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाचे वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी एक हजार २७८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. वर्धा ते कळंबकरिता केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झालेला असून राज्य सरकारकडे निधी प्रलंबित आहे. वर्धा-नांदेड रेल्वेचे काम एक ते दीड वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली.वर्धा-यवतमाळ या ७८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेकामाच्या प्रगतीचा आढावा खासदार रामदास तडस यांनी घेतला. यावेळी भूसंपादन अधिकारी सुनील कोरडे, मध्ये रेल्वे विभागचे उपअभियंता एच. एल. कावरे, एम. एम. सत्यमूर्ती, बालमोमुद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते.वर्धा जिल्ह्यातील वर्धा-नांदेड रेल्वे लाईनकरिता ४८.४८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करावयाची होती. पैकी ०८.३७ हेक्टर जमीन संपादित केलेली असून सालोड, हिरापूर, देवळी, बाभूळगाव, भिडी, शिरपूर, रत्नापूर, सेलसुरा, मेघापूर या गावातील शेतकºयांकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण होईल, अशी माहिती भूसंपादन अधिकारी यांनी दिली.वर्धा-कळंबदरम्यान १० मोठ्या पुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. तसेच यशोदा नदीवरील व भिडी येथील दोन पुलांचे काम पूर्ण झाले असून वर्धा नदीवरील रेल्वे पुलाचे काम न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित होते. मात्र, आता आता उर्वरीत कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. वर्धा-कळंब दरम्यान स्टेशन इमारत व कार्यालये बांधकामाची निविदा अंतिम झाली. वर्धा-कळंबसाठी स्टाफ क्वार्टर बांधणे, वर्धा-कळंबसाठी आरओबी बांधण्यासाठीची निविदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मध्ये रेल्वे विभागाचे उपअभियंता कावरे यांनी दिली.भूसंपादनात शेतकऱ्यांवर अन्याय व्हायला नकोवर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता तत्कालीन खासदार विजय दर्डा यांनी प्रकल्प मंजूर करून प्रकल्पाला गती प्रदान करण्याकरिता प्रयत्न केलेले आहे तसेच तसेच वर्धा-यवतमाळ - नांदेड रेल्वे प्रकल्प कालबद्ध वेळेत पूर्ण व्हावा म्हणून २०१४ पासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेचे काम जलदगतीने पूर्ण करण्याकरिता प्रलंबित कामांना गती द्यावी तसेच वर्धा-यवतमाळ मध्ये रेल्वेलाईनकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. भूसंपादन केल्यानतर त्वरित मोबदला देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यानां खासदार रामदास तडस यांनी दिल्या.

टॅग्स :railwayरेल्वेRamdas Tadasरामदास तडस