शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

आधार लिंकशिवाय खत नाही

By admin | Updated: May 8, 2017 00:37 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची कामे आटोपत असून त्यांच्याकडून बी-बियाणे आणि खताच्या खरेदीची लगबग सुरू होण्याचे संकेत आहे.

नोंदणीकृत खत विक्री केंद्रांत लागणार पॉस मशीन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची कामे आटोपत असून त्यांच्याकडून बी-बियाणे आणि खताच्या खरेदीची लगबग सुरू होण्याचे संकेत आहे. यातच शासनाने कृषी केंद्रातून यंदा शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक केल्याशिवाय खत मिळणार नसल्याचे धोरण ठरविले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी दुकानात जाताना आधार कार्ड घेवूनच जाणे बंधनकारक झाले आहे. वर्धा जिल्ह्यात कृषी विभागाकडे एकूण ६०५ खत विक्रेत्यांची नोंदणी झाली. या सर्वच दुकानांत ही मशीन लागणार आहे. मशीन लावण्याच्या कामाला १५ मे पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे आधार कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांनाच खत मिळेत असे संकेत आहे. या मशीनच्या वापरासंदर्भात कृषी विभाग आणि खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तीन तालुक्यातील खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात देण्यात आले आहे. उर्वरीत व्यावसायिकांना येत्या १२ मे रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या पॉस मशीनची चर्चा असली तरी त्याच्या वापरावरून गोंधळ निर्माण झाला आहे. शेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीला प्रारंभ झाला आहे. वखरणी होताच खते आणि बियाण्याच्या खरेदीची शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे. अशात या पॉस मशीनच्या गोंधळामुळे घोळाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कृषी विभागाने या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. सबसिडीवर चाप खत विक्री करताना कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सबसिडीचा घोळ होत होता. आता या घोळाला पॉस मशीनमुळे चाप बसणार आहे. या मशीनमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक होणार नाही तोपर्यंत खताची उचल होणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे विक्री दाखवून सबसिडी उचलणाऱ्यांचे धाबे दणानले आहे. अनेकांकडून होते धूळपेरणी वर्धा जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता येथील शेतकऱ्यांकडून धूळपेरणी करण्यात येते. या पेरणीदरम्यान शेतकऱ्यांना खताची गरज भासणार आहे. अशा वेळी या पॉस मशीनमुळे त्यांचे नियोजन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुबलक खत आणि बियाणे जिल्ह्यात यंदाच्या खरीपात बियाण्याकरिता आणि खतांकरिता शेतकऱ्यांना भटकण्याची वेळ येणार नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा होणाऱ्या पेऱ्याला ७२ मेट्रीक टन खताची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली होती. यापेक्षा अधिक खत जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. मागणीच्या तुलनेत १.२८ मेट्रीक टन खत अतिरिक्त असल्याचे कृषी विभाकडून सांगण्यात आले आहे. कापूस उत्पादक जिल्हा असल्याने येथे कपाशी बियाण्यांच्या ९.८० लाख पाकिटांची गरज आहे. मात्र जिल्ह्याला १६ लाख पाकिटे मिळणार आहे.