शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा विभागात अव्वल

By admin | Updated: September 21, 2016 01:06 IST

पावसाच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करून शेत-शिवारात जलसाठे निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या

३७ हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्मितीवर्धा : पावसाच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करून शेत-शिवारात जलसाठे निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा आघाडीवर आहे. नागपूर विभागातील सहांपैकी सर्वाधिक पाणी साठवण क्षमता वर्धा जिल्ह्यात निर्माण झाली. जलयुक्त शिवार अभियानामुळे २५ हजार हेक्टर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यात ४ लाख ४८ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावर यावर्षी खरीपाची लागवड झाली आहे. त्यामध्ये केवळ २७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून उर्वरित ७३ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे पावसाची अनियमितता आणि शेतीची उत्पादकता यांचा थेट संबंध आपल्या जिल्ह्यात पहायला मिळतो. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना हा अनुभव आलाच. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे झालीत, तेथील शेतकऱ्यांना तिथे साचलेल्या पाण्याने तारले. आॅगस्ट महिन्यात पावसाने महिनाभर खंड दिला. पिके कोमेजायला लागतील तेव्हा सिमेंट बंधारा, शेततळे नाल्यातील पाण्यामुळे पिकांना नवसंजिवनी मिळाली.जलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये २१४ गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ११५ गावांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले आहे तर ४४ गावांमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त काम झाले आहे. या १५९ गावांमधील शेतकऱ्यांनी खंड काळात नाल्यामध्ये व सिमेंट बंधाऱ्यामुळे साठलेल्या पाण्याचा उपयोग ओलीत करून पिके वाचविण्यासाठी केला.यावर्षी जिल्ह्यातील किमान २५ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना तरी पावसाच्या लहरीपणाचा फटका बसणार नाही. याशिवाय नाला खोलीकरण आणि सिमेंट नाला बांधमुळे विहिरीच्या पाणी पातळीत दीड ते दोन मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना पावसाच्या खंड काळात तसेच रब्बी पिकासाठी होणार आहे.(प्रतिनिधी)३,२०६ पैकी २,८९६ कामे पूर्ण गतवर्षी २१४ गावांमध्ये ३,२०६ कामे घेण्यात आली होती. यापैकी २,८९६ कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांमुळे जिल्ह्यात ३७ हजार ४५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठी निर्माण झाला आहे. या पाण्याचा उपयोग कापूस पिकासाठी एकदा पाणी दिल्यास २४ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात सिंचन होवू शकते. तर दोनदा पाणी वापरल्यास १२ हजार ४८६ हेक्टर सिंचन होवू शकते.