शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षी कारभारामुळे होतो मनस्ताप

By admin | Updated: May 10, 2017 00:48 IST

हिंगणघाट येथील कोचर वार्ड भागातील रहिवासी सचिन बळबंत धारकर यांनी बाबुजी मोटर्स हिंगणघाट याच्या

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : हिंगणघाट येथील कोचर वार्ड भागातील रहिवासी सचिन बळबंत धारकर यांनी बाबुजी मोटर्स हिंगणघाट याच्या मध्यस्तीने नवीन दुचाकी विकत घेतली. परंतु, गत महिन्याभऱ्यापासून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने त्यांच्या नवीन दुचाकीची नोंदणीच करण्यात आली नाही. परिणामी, त्यांना स्थायी क्रमांकासाठी चांगलीच माथापच्छी करावी लागली. दरम्यानच्या काळात त्यांना वाहनावर क्रमांक नसल्याच्या कारणाने दोन वेळा वाहतूक पोलिसांनी चलान दिले. क्रमांकाबाबत विचारणा केली असता दुचाकी विक्रेत्यासह उपप्रादेशिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही उडवा-उडवीचे उत्तरे देत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे धारकर यांचे म्हणणे आहे. उपप्रादेशिक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तेथील कर्मचाऱ्यांकडून नेहमीच उलटसुलट उत्तरे दिली जात असल्याने याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. महिना लोटूनही वाहनांची नोंदणी होत नसल्याने व नवीन वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. उडवा-उडवीचे उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. सचिन धारकर यांनी २८ मार्चला बाबुजी मोटर्स हिंगणघाट यांच्या मध्यस्तीने सुरूवातीला थोडीफार रोकड देत त्यांनी कर्ज घेत नवीन दुचाकीची खरेदी केली. सुरूवातीला त्यांना दुचाकीसाठी तात्पूर्ता क्रमांक देण्यात आला. परंतु, दुचाकीवर लावलेले कागदी स्टीकर अल्पावधीतच गळून पडले. आठ दिवसांचा कालावधी लोटल्याने त्यांनी स्थायी क्रमांक आला काय याची विचारणा असता लवकरच क्रमांक मिळेल असे सांगण्यात आले. बराच कालावधील लोटूनही दुचाकीसाठी स्थायी क्रमांक मिळाला नसल्याने त्यांनी वर्धा येथील अधिकृत दुचाकी विक्रेत्याचे कार्यालय गाठले. विचारा केली असता दुचाकीचा क्रमांक अद्यापही मिळाला नाही, असे धारकर यांना सांगण्यात आल्याचे धारकर सांगतात. धारकर यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय गाठून विचारा केली असता कर्मचाऱ्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिल्याचे धारकर यांचे म्हणणे आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दुर्लक्षी कारभारामुळे धारकर यांना दोन वेळा वाहनावर क्रमांक नसल्याने कारण दाखवत चलान देण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.