शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्गावर वाहतूक धोक्याची

By admin | Updated: May 8, 2017 00:38 IST

सर्वाधिक रहदारीचा भार असलेले राज्यमार्ग सुस्थितीत असणे गरजेचे असते. सुस्थितीत म्हणजे केवळ रस्ता गुळगुळीत असून चालत नाही

झुडपे, दुकानांचे अतिक्रमण : बांधकाम विभागाची डोळेझाक लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सर्वाधिक रहदारीचा भार असलेले राज्यमार्ग सुस्थितीत असणे गरजेचे असते. सुस्थितीत म्हणजे केवळ रस्ता गुळगुळीत असून चालत नाही तर रस्त्याच्या कडेला असलेली झुडपे कापलेली असणे तथा वाहने, दुकानांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे असते; पण वर्धा ते यवतमाळ राज्य मार्गावर झुडपांसह वाहनांचेही अनेक ठिकाणी अतिक्रमण दिसते. यामुळे वाहतूक धोक्याची ठरत आहे. वर्धा ते यवतमाळ राज्य मार्गावर सेलसुरा गावाजवळ रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहे. रस्त्यापर्यंत असलेल्या या झुडपांमुळे वाहने रस्त्याच्या काठाने चालविणे धोक्याचे ठरत आहे. याच मार्गावर सेलसुरा ते सालोड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहने उभी असतात. या वाहनांमुळे चालकांना सावधगिरी बाळगूनच आपली वाहने काढावी लागतात. शिवाय अनेक ठिकाणी रस्त्यापर्यंत दुकाने, घरे आहेत. सालोड येथे रस्त्यापर्यंत दुकाने असल्याने अपघाताचा धोका असतो. शिवाय प्रवासी निवारा, आॅटो स्टॅण्ड, नागरिकांची घरेही रस्त्यापर्यंत आहेत. यामुळे हा रस्ता वाहतुकीस अपुरा ठरत आहे. याच प्रकारामुळे सालोड ते सेलसुरा दरम्यान अनेकदा मोठे अपघात झाले आहेत. यात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून ही बाब प्रवाशांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे. सालोड बायपास चौकातील रस्ता दुभाजक झाले रस्त्याला समांतर नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली असता बायपास चौकांमध्ये रस्ता दुभाजकांची निर्मिती करण्यात आली होती. हे रस्ता दुभाजक अत्यंत ठेंगणे केल्याने त्यांची मोडतोड झाली आहे. वर्धा शहरातील दत्तपूर चौक, जुनापाणी चौक, सावंगी चौक तसेच सालोड चौकातील रस्ता दुभाजकही अत्यंत ठेगणे व मोडकळीस आलेले आहेत. सालोड चौकातील रस्ता दुभाजक तर वारंवार रस्ता दुरूस्तीमुळे रस्त्याला समांतरच झाल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी या दुभाजकांची रंगरंगोटी कण्यात आली होती; पण सध्या दुभाजकांची दयनिय अवस्था झाली आहे. सालोड चौकातून सर्वाधिक अवजड वाहनांची वाहतूक होते. यामुळे या चौकात सुशोभित केलेले, रिफ्लेक्टर लावलेल्या उंच दुभाजकांची गरज आहे; पण या दृष्टिने प्रयत्न होत नसल्याचेच दिसून येत आहे. वाहनांमुळे अपघाताची शक्यता वर्धा ते यवतमाळ मार्गावरील देवळी ते वर्धा दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी केली जातात. हा प्रकार सेलसुरा ते सावंगी दरम्यान अधिक पाहावयास मिळतो. सालोड बायपास चौकामध्येही मोठी वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. असे असले तरी किमान रस्ता पूर्ण होईस्तोवर या प्रकारांवर आळा घालणे गरजेचे झाले आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. बांधकाम विभाग व पोलिसांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.