शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गावात चोरट्यांची दहशत

By admin | Updated: August 3, 2015 01:51 IST

गावात गत दोन दिवसांपूर्वी चोरीच्या उद्देशाने जमलेले १५ ते २० युवक एका महिलेच्या सतर्कतेने पळाले. या घटनेची माहिती गावात व आसपासच्या परिसरात पसरताच सर्वत्र चोरट्यांची दहशत पसरली आहे.

नागरिक भयभीत : दिवसभर शेतीची कामे व सायंकाळी जागली
अल्लीपूर : गावात गत दोन दिवसांपूर्वी चोरीच्या उद्देशाने जमलेले १५ ते २० युवक एका महिलेच्या सतर्कतेने पळाले. या घटनेची माहिती गावात व आसपासच्या परिसरात पसरताच सर्वत्र चोरट्यांची दहशत पसरली आहे. यामुळे दिवसभर शेतात काम करून घरी परतल्यावर रात्र जागून काढण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
शुक्रवारी रात्री गावात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने १५ ते २० युवक चारचाकी वाहने घेवून गळोबा वॉर्डातील आरोग्य केंद्राजवळ उभे होते. यावेळी रात्रीचे १.३० वाजले होते. संपूर्ण गाव गाढ झोपेत असतांना वंजारी यांच्या घरासमोर हे चोरटे दिसताच येथील एका महिलेचे त्यांच्याकडे लक्ष गेले असता तीन आरडाओरड केली. यामुळे घरची मंडळी जागी झाली. या लोकांनीही आरडाओरड केली असता १० ते १५ युवक पळताना दिसले. त्यांनी बनियन व बरमुडा परिधान केल्याचे दिसून आले.
या घटनेच्या पूर्वी ढगे ले-आऊट व वॉर्डातील काही नागरिकांनाही असे युवक दिसल्याची चर्चा आहे. यावेळी नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला असता पाठलाग केला असता त्यातील एका दरेडेखोराची चप्पल सापडून आली. याची माहिती अल्लीपूर पोलिसांना देताच त्यांनीही चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. अल्लीपूर पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला असून गावात गस्त वाढविण्यासंदर्भात नागरिकांनी मागणी केली आहे.(वार्ताहर)
तीन दिवसात दोन चोऱ्या
नंदोरी - चोरट्यांनी रात्रीच्या सुमारात घरात मागील भागातील पाण्याचे टाके फोडुन चाकुच्या धाकावर रोख १२ हजार रुपयांसह मोबाईल, सोन्याची चेन आदी साहित्य लंपास केले. दुसऱ्या घटनेत नंदोरी चौकातील पानटपरी फोडून ३०० रुपये रोख व ३ हजारांंचा मुद्देमाल लंपास केला.
चोरट्यांनी बुधवारच्या मध्यरात्री १ वाजता दरम्यान चंद्रकौर टाक यांच्या घरातील मागील बाजूस असलेले पाण्याचे टाके फोडून यांच्या घरात प्रवेश केला. त्यांना चाकचा धाक दाखवपून रोख १२ हजार रुपये, मोबाईल, कपाटातील सोन्याची साखळी २० ग्रॅम व अंगठी ५ ग्रॅम असा ऐवज लंपास केला. घरात शिरलेले दोन्ही चोरटे चेहऱ्यावर रूमाल गुंडाळून होते असे टाक यांनी पोलिसांना सांगितले.
नंदोरी चौकातील पानटपरीधारक नत्थूजी पंचवटे हे पानटपरी उघडण्यास गेले असताना त्यांना चोरी झाल्याचे शनिवारी उघडकीस आले. यात चोरट्यांनी पानटपरीचे मागील बाजूचे टिनपत्रे कापून ३०० रूपये रोखसह ३ हजार रुपयांचा पानमटेरीयल साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. चंद्रकोर टाक व नत्थूजी पंचपटे यांनी समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.