शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

बसथांब्यावर विद्यार्थ्यांची घुसमट

By admin | Updated: September 28, 2016 01:59 IST

राज्य परिवहन महामंडळाकडून ‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे म्हणत बससेवा पुरविली जाते;

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही : अनेक बसस्थानकांचीही स्थिती चिंताजनकवर्धा : राज्य परिवहन महामंडळाकडून ‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे म्हणत बससेवा पुरविली जाते; पण हा प्रवास कालौघात दु:खाचा झाल्याचे चित्र आहे. भंगार बसेस, दुरवस्थेत असलेली बसस्थानक, प्रवासी निवारे आणि असुविधांचा बाजार यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची घुसमट होत आहे. जिल्ह्यातील निवाऱ्यांची दुरवस्था आणि असुविधांनी तर विद्यार्थ्यांचा जीवच टांगणीला लागला आहे. यात विद्यार्थी रस्त्यावरच बसची प्रतीक्षा करीत असल्याचे पाहावयास मिळते.राज्य परिवहन महामंडळांकडून मोठी गावे, शहरांमध्ये बसस्थानकाची तर रस्त्यावरील गावांसाठी प्रवासी निवाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून बसची प्रतीक्षा करण्यासाठी छप्पर उपलब्ध करून देण्यात आले; पण त्याच्या देखभाल, दुरूस्तीकडे कुणीही लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. परिणामी, सध्या बहुतांश बसस्थानके आणि प्रवासी निवारे भग्नावस्थेत आढळून येतात. अद्याप अनेक गावांसाठी तर प्रवासी निवाऱ्यांची सोयही करण्यात आलेली नाही. यामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांना रस्त्यावरच बसची प्रतीक्षा करीत उभे राहावे लागते. वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांना निवाऱ्यांची सुविधा देण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. काही ठिकाणी निवारे आहेत तर असुविधांनी कळस गाठला आहे. राज्य परिवहन महामंडळाने या संपूर्ण प्रकारांकडे लक्ष देत निवाऱ्यांची दुरूस्ती करणे व नवीन निवारे उभारणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)