शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे विद्यार्थी देवळी बसस्थानकावर अडकले

By admin | Updated: August 13, 2015 02:44 IST

मंगळवारी दुपारपासूनच सुरू झालेल्या पावसाचा तडाखा आर्वी, देवळी आणि कारंजा (घा.) तालुक्याला बसला.

जनजीवन विस्कळीत : निम्न वर्धाचे पुन्हा ३१ ही दरवाजे उघडलेवर्धा : मंगळवारी दुपारपासूनच सुरू झालेल्या पावसाचा तडाखा आर्वी, देवळी आणि कारंजा (घा.) तालुक्याला बसला. त्यामुळे सर्वत्र नद्यांना पूर येऊना अनेक गावांचा संपर्क तुटला. देवळी बस स्थानकावर विद्यार्थ्यांना रात्रीपर्यंत थांबावे लागले. शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले. वर्धा, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. मंगळवारी सायंकाळी अचानक धो-धो पाऊस झाल्यामुळे देवळी तालुक्यात सर्वत्र दाणादाण उडाली. यशोदा नदीला पूर आल्यामुळे नांदोरा व डिगडोह येथील शाळकरी विद्यार्थ्यांना रात्री साडेदहा वाजेपर्यंत देवळी बसस्थानकावर अडकून पडावे लागले. काहींना जवळच्या नातेवाईकांनी व शिक्षकांनी घरी नेले. नदी परिसरातील सर्व गावांची शेती खरडून निघाल्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मंगळवारी दुपारनंतर मुळसधार पावसाला पावसाला सुरूवात झाली. तब्बल तीन ते चार तास हा पाऊस एकसारखा सुरू होता. यादरम्यान सायंकाळी ६ वाजेपर्यंत नांदोरा व डिगडोह या दोन्ही गावातील यशोदा नदीला पूर आला. पुलावरून चार फुटपर्यंत पाणी फेकत असल्याने सर्व विद्यार्थी अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत पूर न ओसरल्यामुळे काही विद्याथ्यांर्च्या निवासाची व भोजनाची सोय सेवाभावी नागरिकांनी केली. रात्री अकरा दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना पुलगाव मार्गे गावी जाणे शक्य होते त्यांना घरी पोहचवून देण्यात आले. नगराध्यक्ष शोभा तडस यांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. तहसील कार्यालयातील अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनीही मदतीचा हात पुढे करण्याची अपेक्षा असताना त्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे.खैरी गावाचा संपर्क तुटलेलाचआकोली- सेलू तालुक्यात व आकोली महसूल साझात येणाऱ्या खैरी गावाचा सोमवार रात्री १० वाजतापासून संपर्क तुटला असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. १५०० लोकसंख्येच्या या गावाची कहाणीच जगावेगळी आहे. गावाच्या मागे मदन उन्नयी धरण तर पुढे बेफाम वाहणारी धामनदी. नदीवरील ठेंगणा पुल व त्यातच महाकाळी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे थोड्याही पावसाने या पुलावरून पाणी वाहते. तीन दिवसांपासून या पुलावर पाणी असल्याने विद्यार्थी शिक्षणासाठी जाऊ शकले नाही. काही घरात तापाने रूग्ण फणफणत आहे. पण दवाखान्यात नेणार कसे हा प्रश्न आहे. गरोदर महिलांचा जीव तर अक्षरश: टांगणीला लागला आहे. दूध विक्रेत्यांना चंदीवर दूध पोहचता करता येत नाही. ग्रामसेवक, तलाठी पुलापर्यंत येतात व निघून जातात. पूल उंच करण्याकरिता शासनदरबारी प्रयत्न झाला. परंतु लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल ठरली. त्यामुळे आता तरी प्रशासनाने या गावाला असलेला धोका ओळखून पूल उंच करण्याची मागणी होत आहे. तहसीलदार रवींद्र होळी यांनी पूरस्थळाची पाहणी केली.