शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: June 3, 2016 02:03 IST

पुलगाव येथील दारूगोळा भांडारामध्ये चौथ्यांदा झालेल्या स्फोटामुळे हादरलेल्या परिसरातील त्या पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

सर्वेक्षण व मोजणी झाली : प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबितच
पराग मगर वर्धा
पुलगाव येथील दारूगोळा भांडारामध्ये चौथ्यांदा झालेल्या स्फोटामुळे हादरलेल्या परिसरातील त्या पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
दारूगोळा भांडाराच्या कक्षा रुंदावणार होत्या. यासाठी काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण व जमिनीची मोजणी झाली. तत्सम आखणी करण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया होत असल्याने नाचणगाव, पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी, मुरदगाव आणि येसगाव येथील नागरिकांत लवकरच आपल्याला राहते घर सोडावे लागणार, अशी भावनाही निर्माण झाली होती; पण घोडे कुठे अडले कळलेच नाही. अद्यापही या गावांचे पुनर्वसन न झाल्याने दहशतीत जगावे लागत आहे. यामुळे पाचही गावांचे पुनर्वसन कधी होणार? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. २८ किमीच्या विस्तीर्ण जागत असलेल्या पुलगाव दारूगोळा भांडारालगत वस्ती असू नये, असे नियम आहे. तशी दाट वस्तीही दारूगोळा भांडाराच्या आसपास नाही; पण लगतची गावे कायम आहेत. दारूगोळा भांडाराच्या सिमेपासून काही अंतरावर पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी आणि मुरदगाव ही गावे आहेत. पुलगाव दारूगोळा भांडारामध्ये नेहमी स्फोट होत असतात. पूर्वी मुदत संपलेले बॉम्ब खंदकामध्ये फोडले जात होते. यात होणाऱ्या स्फोटामुळे परिसरातील गवताला आगीही लागत होत्या. यामुळे जीविताला धोका होऊ नये म्हणून पाचही गावे रिकामी करावी लागत होती.
या गावांतील नागरिकांना देवळी येथील धर्मशाळेत आणि नाचणगाव येथील मंदिरामध्ये थांबविले जात होते. दारूगोळा भांडारातील आग नियंत्रणात आली की, पुन्हा ग्रामस्थ आपापल्या घरी परतत होते. गत कित्येक दशकांपासून हा प्रकार सुरू आहे. यावर तोडगा म्हणून पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी, मुरदगाव व येसगाव ही गावे ताब्यात घेत नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी समोर आली होती. शिवाय दारूगोळा भांडाराचे विस्तारीकरणही प्रस्तावित होते. यामुळे पाचही गावांचे पुनर्वसन होणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. याबाबत सर्वेक्षण, मोजणीही करण्यात आली; पण आठ-दहा वर्षांचा काळ लोटला असताना अद्यापही पुनर्वसनाची प्रक्रिया पूढे सरकली नाही. पुलगाव दारूगोळा भांडाराला लागून असलेल्या पाचही गावांतील जमिनीचे अधिग्रहण करून नागरिकांना मोबदला देणे आणि पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देणे, ही बाब प्रस्तावित होती; पण काळ लोटला असताना केंद्र शासनाकडून कुठलीही भूमिका घेण्यात आली नाही. यामुळे आजही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत आहे.
आता काल-परवा झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता तर पिपरी (खराबे) या गावातील नागरिकही आमच्या जमिनी घ्या आणि गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी करू लागले आहेत. आगरगाव, नागझरी, मुरदगाव व येसगाव येथील नागरिकांनीही जमिनी अधिग्रहित करून पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या या मागणीचा आता तरी विचार होणार की नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.

पुलगाव येथील दारूगोळा भांडारामध्ये सोमवारी रात्री स्फोट झाला. याचा परिसरातील गावांना जबर हादरा बसला. या स्फोटाने लागलेली आग विझली असली तरी समाजातील धग कायम आहे. शहिदांच्या कुटुंबीयांचा टाहो, मृतदेह न मिळणे, ओळख न पटणे ही एक बाजू आणि अर्ध्या रात्री जीवाच्या आकांताने ग्रामस्थांची होणारी पळापळ, ही दुसरी बाजू. दोन्ही पैलू मन अस्वस्थ करणारेच आहेत.