शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
3
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
4
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
5
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
6
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
9
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
10
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
11
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
20
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणच्या पाच विभागातील विभाजनाला विरोध

By admin | Updated: December 24, 2015 02:48 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सन २००६ मध्ये तीन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले. आता महावितरण कंपनीचे आणखी पाच विभागात ...


वर्धा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सन २००६ मध्ये तीन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले. आता महावितरण कंपनीचे आणखी पाच विभागात विभाजन करण्याची घोषणा राज्य शासनातर्फे करण्यात आली. या विभाजनास महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध केला असून या विरोधात मोर्चा काढण्याचे प्रस्तावित आहे.
महावितरण कंपनीचे विभाजन करण्याऐवजी राज्यातील सर्व १६ झोन कार्यालयांना सक्षम बनवून प्रशासकीय विकेंद्रीकरण करण्यात यावे आणि विभागीय कार्यकारी संचालक यांच्या नियंत्रणात संघटनेने सुचविल्यानुसार अंतर्गत सुधारणा नुसार महावितरण कंपनीला आर्थिक, प्रशासनिकदृष्ट्या पारदर्शक बनवून ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांचेकडे केली आहे.
विभागीकरणामुळे महावितरण कंपनीचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक व प्रशासनिक हित जोपासले जाणार नसून राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढून खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची भरती, पदोन्नती, घटनात्मक अधिकार यावर त्यामुळे गंभीर परिणाम होणार असल्याने राज्य शासनाने विभागीकरणाचे पाऊल मागे न घेतल्यास राज्यातील ६० हजार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पंसख्यांक वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. इतरही प्रलंबित मागण्यांसाठी सर्व वीज कर्मचाऱ्यांनी २९ डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.(प्रतिनिधी)