शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पुनरागमन पिकांना नवसंजीवनी

By admin | Updated: August 20, 2014 23:41 IST

विद्युल्लतेच्या कडकडाटासह जिल्ह्यात कोसळलेल्या जलधारांनी शेतकऱ्यांना सुखावले़ काही प्रमाणात का होईना पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतपिकांना नवसंजीवणी मिळणार आहे़ दरम्यान,

काही ठिकाणी तुरळक : चार ठिकाणी वीज पडून नुकसानवर्धा : विद्युल्लतेच्या कडकडाटासह जिल्ह्यात कोसळलेल्या जलधारांनी शेतकऱ्यांना सुखावले़ काही प्रमाणात का होईना पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतपिकांना नवसंजीवणी मिळणार आहे़ दरम्यान, जिल्ह्यात चार ठिकाणी वीज पडली़ यात समुद्रपूर व पवनार येथे कुठलेही नुकसान झाले नसले तरी सेलू तालुक्यातील रेहकी येथे वीज पडल्याने विद्युत उपकरणांचे नुकसान झाले़ घोराड येथेही वीज कोसळली; पण नुकसान झाले नाही़गत एक महिन्यापासून जिल्ह्यात पावसाचा थेंब नव्हता़ पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी चिंतातुर होते़ शिवाय श्रावण महिन्यातील वातावरण त्यात भर घालत होते़ उन्हाचा तडाखा व दमट वातावरणामुळे गर्मी वाढली होती़ पावसाच्या दडीमुळे पिकांची दयनिय अवस्था झाली होती़ शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी स्प्रिंकलरचा आधार घ्यावा लागला होता़ कोरडवाहू शेतकऱ्यांची तर गळचेपीच झाली होती़ अनेकांनी मजुरांच्या साह्याने पिकांना पाणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला; पण तो अत्यंत अपुरा पडत होता़ आणखी काही दिवस पाऊस आला नसता तर पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढले असते़ थोडा का होईना; पण पाऊस आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ वातावरणातील गर्मी कमी झाली नसली तरी पिकांना या पावसामुळे संजीवणी मिळणार आहे़मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील सेलू, आर्वी, हिंगणघाट, देवळी, वर्धा, समुद्रपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली़ रात्रभर विजेचा कडकडाट सुरू होता; पण विशेष जलधारा कोसळल्या नाही़ समुद्रपूर येथे शेतात वीज कोसळली़ यात नुकसान झाले नाही़ सेलू तालुक्यातील रेहकी येथे भरवस्तीत वीज पडल्याने नागरिकांचे नुकसान झाले़ पवनार येथेही शेतात वीज कोसळली़ यात कपाशीची ७० ते ८० झाडे जळालीत़ वीज पडल्याने कुठेही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही़(लोकमत न्यूज नेटवर्क)