शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

अस्थिविसर्जनातून निसर्ग संगोपनाचा संदेश

By admin | Updated: May 20, 2016 01:53 IST

अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते.

चिलवीरवार कुटुंबियांनी ठेवला आदर्श : अस्थी, रक्षा स्मशानभूमीत पुरून त्यावर वृक्षारोपणहिंगणघाट : अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते. हे प्रदूषण टाळण्याकरिता स्मशानभूमीतच खड्डा करून त्यात अस्थी, चितेची राख पुरून त्यावर वटवृक्षाचे रोपटे लावत येथील तहसील वॉर्डातील लेबर कॉलनीत चिलवीरवार कुटुंबियांनी निसर्ग संगोपणाचा नवीन पायंडा घालून दिला आहे.अस्थी, चितेची राख, पूजाविधीत काढलेले डोक्यांवरील केस नदीत विसर्जन करण्याची परंपरा आहे; पण यातून नदीपात्राचे प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्याचा निर्णय चिलवीरवार कुटुंबियांनी घेतला. यातून समाजापुढे पर्यावरण रक्षणाचा एक आगळा आदर्श ठेवला गेला.खड्ड्यात ही राख, अस्थी ठेवून त्यावर वटवृक्षाचे रोपटे लावले. या वटवृक्षाच्या सुरक्षेकरिता सुरक्षा कठडाही चिलवीरवार कुटुंबियांनी बसविला. या झाडातून आपल्या वडिलांची आठवण जपण्याचा संकल्पही त्यांनी येथे सोडला. येथील श्याम बळीराम चिलवीरवार यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वणा नदीच्या तिरावरील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आला; पण यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेहावरील निर्माल्य, कापलेले केस नदीत विसर्जित न करता स्मशानभूमीवर खड्डा करून त्यात टाकले. यानंतर अस्थी, चितेच्या राखेचे विसर्जन कुठल्याही नदीत वा तलावात न करता स्मशानभूमित एका खड्ड्यात पुरून त्यावर वडाचे रोप लावण्यात आले. यावेळी श्यामराव चिलवीरवार यांची मुले विष्णु चिलवीरवार, अनिल चिलवीरवार, उषा परकोटवार, सामाजिक कार्यकर्ते धनराज गोल्हर आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून आणि पर्यावरण रक्षणाला हातभार लावता यावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असे विचार चिलवीरवार कुटुंबातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)