शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे दर कडाडल्याने गृहिणींचे बजेट गडगडले

By admin | Updated: April 16, 2016 01:33 IST

उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटत असल्याने होणारी दरवाढ ही बाब नेहमीचीच झाली आहे.

सर्वसामान्यांना महागाईचे चटके : आंब्याचे भावही भिडले गगनाला
वर्धा : उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटत असल्याने होणारी दरवाढ ही बाब नेहमीचीच झाली आहे. गतकाही वर्षांपासून भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढल्याने उन्हाळ्यात मंदावणारी आवक आता वाढली असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते. असे असले तरी टमाटर आणि कांदे वगळता अन्य भाज्यांचे दर किलो मागे सर्वसाधारण १० रुपयांनी वधारल्याचे दिसून येत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला भाजी घेताना चांगलीच कात्री लागेल, असे चित्र आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याची चव चाखणेही महागातच पडेल, असे दिसून येत आहे. आंब्याची आवक सुरू झाली आहे. प्रारंभी आंब्याचे दर १०० ते १५० रुपये प्रतिकिलो आहेत. शिवाय पन्हे, सरबत आणि लोणच्यासाठी असलेल्या कच्चे आंबे ८० रुपये प्रतिकिलो आहे. भेंडी, चवळी, गवार यांचे दर वधारलेलेच दिसून येतात. यामुळे बाजारात गेल्यानंतर कोणती भाजी विकत घ्यावी, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडत असल्याचे दिसते. वांगे, पालक या भाज्यांचे दर सध्या स्थिर असल्याने अधिक मागणी असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली.
जिल्ह्यात शेडनेट, मल्चिंग शेतीच्या माध्यमातून फळ, भाज्या व पालेभाज्यांची पिके घेतली जातात. या पिकाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने अन्य जिल्ह्यातून भाजीपाल्याची होणारी आयातही कमी झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांकडून मुबलक साठा उपलब्ध होत असल्याचे घाऊक व्यापाऱ्याने सांगितले; पण मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळाने भाजीपाला पिकांना चांगलाच फटका बसला. परिणामी, दरवाढ झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडत असल्याचे दिसते.(स्थानिक प्रतिनिधी)

फळांचे भावही वधारले
उन्हाळ्यात रसाळ फळांची विशेष मागणी असते. यात द्राक्ष, तरबुज, डांगर, डाळींब यांची अधिक विक्री होते. दरवर्षी द्राक्षाचे भाव ४० ते ८० रुपयांपर्यंत असतात; पण यंदा या भावात वाढ झाल्याचे दिसते. बाजारात ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे द्राक्ष आहेत. द्राक्षात तीन प्रकार असून कॅप्सूल आणि काळ्या द्राक्षांचे भाव अधिकच आहेत. शिवाय आंब्याचे दर प्रारंभीपासूनच अधिक असल्याने यंदा आंबा आणखी महागणार, असे चित्र आहे. सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक मर्यादित आहे. मे महिन्यापर्यंत आवक वाढल्यास भाव कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली. बैगणपल्ली, बदाम या आंब्यांचे भाव सध्या १०० ते १५० रुपये किलो आहेत.