शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला क्विंटलमागे १५०० रुपये बोनस द्या- राकाँ

By admin | Updated: November 29, 2014 01:59 IST

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नाच्या खर्चावर आधारित आणखी ५० टक्के भाव वाढवून देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते;...

वर्धा : सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नाच्या खर्चावर आधारित आणखी ५० टक्के भाव वाढवून देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते; पण भाव वाढवून देण्याचे तर सोडाच असलेल्या भावाच्या ५० टक्के कमी भाव देण्यात येत आहे. केवळ ४०५० रुपये भाव देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे.
शासनाने दिलेल्या हमीभावाचा निषेध करीत राष्ट्रवादीने शेतकरी जगवायचा असेल तर प्रती क्विंटल १५०० रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे. सदर बोनस त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले़ कृषी संजीवनी योजना अंमलात आली तो काळ हंगामाचा असल्याने शेतकऱ्यांकडे पुरेसा पैसा नव्हता. आता कृषी संजीवनी योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या योजनेला मुदतवाढ द्यावी़ विशेष घटक योजनेंतर्गत विहिरीसाठी देण्यात येणारे १ लाख रुपये अनुदान तोकडे असून ते २ लाख ५० हजार रुपये करावे, वीज पुरवठा उपलब्ध करावा, कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी भरीव अनुदान द्यावे, पीक कर्ज धोरण, आणेवारी पद्धत बदलावी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवून दिलासा द्यावा आदी मागण्या आहेत़ दहा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, शशांक घोडमारे, समीर देशमुख, शरयू वांदिले, संजय काकडे, डॉ. अहमद रिझवी, प्रा. खलील खतीब, संदीप किटे, संदीप भांडवलकर आदींनी जाहीर केली़