शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या जेवणापेक्षा खर्रा झाला महाग

By admin | Updated: July 27, 2014 00:15 IST

आजची युवा पिढी, उद्याचे भवितव्य समजले जाते; पण युवा पिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे़ गुटखा, खर्रा, सिगारेट या वस्तू युवकांच्या दैनंदिन मुलभूत गरजा बनल्याचे दिसते़ तंबाखू,

वायगाव (नि.) : आजची युवा पिढी, उद्याचे भवितव्य समजले जाते; पण युवा पिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे़ गुटखा, खर्रा, सिगारेट या वस्तू युवकांच्या दैनंदिन मुलभूत गरजा बनल्याचे दिसते़ तंबाखू, केशर मिश्रीत असलेल्या खर्रा, गुटख्याचा खर्च दोन वेळच्या जेवणापेक्षा महाग झाल्याचे दिसते़ यामुळे अन्नापेक्षा खर्रा, गुटखा महाग म्हणण्याची वेळ आली आहे़ दिवसापासून किमान दोन वेळ जेवण घेतले जाते; पण अपायकारक असणारा तंबाखू मिश्रीत गुटखा व खर्रा किमान ४ ते ५ वेळा सेवन केला जातो. साधारणत: कमी दर्जाचा तंबाखू मिश्रीत खर्रा १५ रुपये असून एक विशिष्ट तंबाखू मिश्रीत खर्रा पाहिजे असल्यास तो ३० रुपयांचा आहे़ गुटखा पाऊच साधारण ५ ते ७ रुपयांपासून उच्च दर्जाचा गुटखा १५ ते २० रुपयांपर्यंत आणि सिगारेटचा खर्च असा एकूण साधारण तीनही वस्तुंचा खर्च १०० रुपयांवर जातो़ साधारण सर्वसामान्य व्यक्तीला दिवसभरात किमान ३ वेळा खर्रा लागत असला तरी खर्ऱ्याचा खर्च ४५ रुपयांवर जातो. ‘तंबाखूमुळे कर्करोग होतो’ हे प्रत्येक तंबाखू, गुटखा व सिगारेटच्या पाकिटावर नमूद असताना त्याचे शौकीण कमी होताना दिसत नाहीत़ शिवाय खर्रा खाणे वा सिगारेट ओढणे याकडे सध्या फॅशन म्हणूनही पाहिले जात़ यामुळेही या पदार्थांच्या सेवनामध्ये मोठी वाढ होताना दिसते़ बाहेरगावी राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन वेळच्या डब्याचा खर्च ३० ते ३५ रुपये पडतो; पण खर्ऱ्याचा ४५ रुपयांच्या वर असल्याने जेवणापेक्षा खर्रा महाग म्हणावा लागेल़ आरोग्यास हानिकारक असणाऱ्या तंबाखू विक्रीला शासन कर घेऊन विक्रीची परवानागी देते़ यावरून शासन आरोग्यास हानिकारक असलेल्या वस्तुंच्या विक्रीवर कोणताही प्रतिबंध लावत नाही. उलट तंबाखू उत्पादीत करणाऱ्या कंपन्यांना बँकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजावर सबसिडी देते़ शेतकऱ्याच्या शेतमालाला मात्र योग्य भाव दिला जात नाही़ नैसर्गिक आपत्तीबाबत त्वरित मदत, कर्जबाजारी शेतकऱ्याला व्याजावर सबसिडी दिली जात नाही़ महाराष्ट्र राज्य शासनाला सर्वाधिक ३७ टक्के विक्री कर मिळत असल्याचे सांगितले जाते़ असे असले तरी आरोग्यावरील परिणाम लक्षात घेत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)