शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अकरा गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

आष्टी तालुक्यामध्ये ११ गावांमध्ये या वर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, पांढुर्णा, बोरखेडी, चामला, ठेकाकोल्हा, कोल्हाकाळी, मुबारकपूर, किन्ही, मोई या गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देविहिरींच्या पाणी पातळीत घट : उन्हाळ्याच्या प्रारंभीत नदी-नाल्यांना कोरड

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यंदा वेळोवेळी झालेल्या पावसामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी वाढली होती. मात्र, उन्हाळ्याची चाहूल लागताच विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याचे बघावयास मिळत आहे. इतकेच नव्हे, तर तालुक्यातील ११ गावांवर पाणी टंचाईचे सावट आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.आष्टी तालुक्यामध्ये ११ गावांमध्ये या वर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, पांढुर्णा, बोरखेडी, चामला, ठेकाकोल्हा, कोल्हाकाळी, मुबारकपूर, किन्ही, मोई या गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रेडझोन, डार्क झोन, येलो झोन या तिन्ही झोनमध्ये विभागणी झालेल्या अवर्षणप्रवण गावांमध्ये पाण्याची समस्या भीषण निर्माण होणार आहे. थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गवळी बांधव आहेत. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करून ते कुटुंबाचा गाडा हाकतात. पण जनावरांसाठी चारा आणि पाण्याची कमतरता भासण्यास सुरूवात झाल्याने या गावातील जनावरांना दुसरीकडे न्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी समस्या आणखी भीषण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मोई गावासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले होते. या गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. आमदार दादाराव केचे यांनी सदर प्रश्न मार्गी लावला होता. मात्र, जि.प.कडून अद्याप या कामाची सुरुवात झाली नाही. त्यामुळे मोई गावालासुद्धा यावर्षी पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या गावातील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन विहीर आणि टाकीचे काम जलदगतीने होणे क्रमप्राप्त असताना अद्याप काम पूर्णत्वास गेलेले नाही.पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडेकिनी, मोई व मुबारकपूर या जंगलव्याप्त भागात अस्वल, वाघ, बिबट या वन्य प्राण्यांचा वावर असतो. अशातच पाण्याच्या शोधात वन्यप्राणीही गावाकडे येत असल्याचे वास्तव आहे. या गावांसह पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव येथे आवश्यक ठिकाणी बोअरवेल खोदण्याची गरज आहे.तीन दिवसांआड होतोय पाणी पुरवठासार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेअंतर्गत नियमित वेळेवर पाणी मिळत नाही. अनेक गावांमध्ये दोन-तीन दिवसांत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. थार, बोरखेडी, बांबर्डा, चामला या गावांमधील संत्रा बागा आतापासूनच पाण्याअभावी करपत असल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे संत्रा उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.पाणीटंचाई या विषयावर पंचायत समितीत आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी आढावा सभा घेण्यात आली. यामध्ये विविध उपाययोजना करण्यासंदर्भात जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सूचना दिलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली याचा आढावा आणखी घेतला जाईल. तसेच ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जास्त आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.- अनिल गावंडे, गटविकास अधिकारी, पं.स. आष्टी (शहीद).

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई