शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

उलंगवाडीच्या काळात बाजारात कापसाला झळाळी

By admin | Updated: December 23, 2015 02:45 IST

जिल्ह्यात यंदा अत्यल्प आलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा नाही. यामुळे भर हिवाळ्यातच कपाशीची उलंगवाडी होत आहे.

शेतकऱ्यांकडे कापूस नाही : ओलाव्याअभावी दुसरा वेचा होण्याची आशा झाकोळली
फनिंद्र रघाटाटे रोहणा
जिल्ह्यात यंदा अत्यल्प आलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा नाही. यामुळे भर हिवाळ्यातच कपाशीची उलंगवाडी होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून कापूस येण्याची शक्यता नसल्याचे चित्र असताना बाजारात कापसाच्या भावाने झळाळी घेतली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना कमी तर व्यापाऱ्यांना अधिक होणार असल्याचे चित्र आहे.
आॅक्टोबरपासून डिसेंबर पर्यंतच्या काळात शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येतो. या काळात शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याकरिता शासनाकडे शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करावी लागली होती. त्या काळात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडचण पाहूण अत्यल्प दरात कपसाची खरेदी केली. आता मात्र चित्र पालटले आहे. ३ हजार ८०० रुपयांत खरेदी होणाऱ्या कापसाला आज ४ हजार ६०० रुपयांचा दर मिळत आहे. तर काही भागात पाच हजराच्या असापास दर पोहोचले आहेत. आता शेतकऱ्यांकडील कापूस संपला आहे. यामुळे या वाढलेल्या दराचा कुठलाही लाभ या शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अडचणीच्या काळात कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
हंगाम सुरू झाला की भाव पडणे व हंगाम संपल्यावर भाव वाढणे ही बाब गत कित्येक वर्षांपासून शेतकरी अनुभवत आहे. असे असतानाही बळीराजा आर्थिक अडचणीमुळे आपला शेतमाल विक्रीपासून थांबवू शकत नाही तर शासन आपली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याची व्यवस्थाही करीत नाही. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांचे फावते आहे. ते शेतकऱ्यांची लुट करतात व तेजीचा फायदा घेतात. यावर्षी कुठे अत्यल्प पाऊस तर कुठे जीवघेणी अतिवृष्टी यामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असे संकेत सप्टेंबर महिन्यातच आले होते. शासनाने पणन महासंघ व सीसीआय तर्फे ४ हजार १०० रुपये क्विंटलच्या दराने कापूस खरेदी केली असती तर शेतकऱ्यांना निदान हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस विकण्याची वेळ आली नसती. आता आलेल्या तेजीत कापूस गाठींचे सौदे करून होणारा नफा शेतकऱ्यांना बोनसच्या स्वरूपात वाटप होण्याचे संकेत नाही. यामुळे शासन शेतकऱ्यांसाठी काहीच करीत नसल्याचे दिसून येत आहे. हजारो कोटींचे आर्थिक पॅकेज देण्यापेक्षा शेतमालाला तोटा सहन करूनही योग्य भाव दिल्यास शेतकऱ्यांसाठी करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे. शासनातील लोकप्रतिनिधींना व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या लक्षात का येत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे.