शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दत्ता मेघेंच्या उडीने भाजपच्या गटाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:42 IST

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपला स्वपक्षीयांकडून नाराजीचा सामना करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली असताना माजी खासदार दत्ता मेघे यांनी शनिवारी सावंगी येथे पत्रकार परिषद घेवून भारतीय जनता पक्ष व शिवसेना उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देविधान परिषद निवडणुकीत भाजपला निश्चित विजय मिळेल- दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपला स्वपक्षीयांकडून नाराजीचा सामना करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली असताना माजी खासदार दत्ता मेघे यांनी शनिवारी सावंगी येथे पत्रकार परिषद घेवून भारतीय जनता पक्ष व शिवसेना उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. मेघे यांच्या या राजकीय खेळीने भारतीय जनता पक्षाच्या खेम्याला दिलासा मिळाला आहे. या पत्रकार परिषदेत भाजपसह अन्य काही पक्षांचे नगरसेवकही उपस्थित होते. तिनही जिल्ह्यात भाजपला चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा ही माजी खासदार मेघे यांनी केला.
भाजपची स्थिती या निवडणुकीत डामाडौल होत असताना आपल्याला स्थिती सावरण्यासाठी बोलाविण्यात आले काय? असा प्रश्न मेघे यांना विचारताच आपण या निवडणुकीसाठी येणारच होतो. आता निश्चितपणे पक्षासाठी काम करायचे आहे व आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप सोडायची नाही, असे ठरविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इतर पक्षातील ही अन्य मतदार भाजपच्या उमेदवाराला मतदान करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उमेदवार डॉ. रामदास आंबटकर यांंनी दत्ता मेघे यांच्याशी गत तीस वर्षांपासूनचे संबंध आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत असताना नॉर्थ ईस्टच्या विद्यार्थ्यांना मेघे यांच्याकडून मोठी मदत केली जात होती, अशी माहिती त्यांनी दिली. ते अनेक संस्था व व्यक्तींच्या पाठीशी चांगल्या कामाकरिता उभे राहिलेत, असा ही उल्लेख आंबटकर यांनी केला. शिवसेना आपल्या सोबत प्रचारात कुठेही दिसली नाही, असा प्रश्न आंबटकर यांना यावेळी पत्रकारांनी विचारला त्यावर आंबटकर म्हणाले की, राज्यपातळीवरून तीन-तीन जागेंचे वाटप झालेले आहे. त्यामुळे शिवसेना आमच्या सोबतच राहील यात काही शंका नाही. आपण सेनेच्याही अनेक नेत्यांना व मतदारांना भेटलो. जवळपास ९०० मतदारांशी संपर्क केला, असे त्यांनी सांगितले. भाजप मधील मतदार नाराज असले याचा अर्थ ते काँग्रेसला मतदान करतील असा होत नाही. ही कौटुंबिक नाराजी आहे व ती दूर केली जाईल, असेही यावेळी दत्ता मेघे म्हणाले. या पत्रकार परिषदेला आ. डॉ. पंकज भोयर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, वर्धा न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Datta Megheदत्ता मेघे