शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याच्या पाण्यामुळे डांगराचे पीक गेले वाहून

By admin | Updated: May 29, 2016 02:18 IST

भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी आहे. सोबतच जोडधंदा म्हणून उन्हाळ्यात ते डांगराचे उत्पादन घेतात.

शेतकऱ्यांचे नुकसान : भरपाईसाठी प्रशासनाला साकडे
हिंगणघाट : भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी आहे. सोबतच जोडधंदा म्हणून उन्हाळ्यात ते डांगराचे उत्पादन घेतात. यंदाही डांगराची पिके घेतली; पण पालिकेने विकत घेतलेला अस्थाई बंधारा फुटल्याने डांगराची शेतीच वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर नुकसानाची शासनाने भरपाई करावी, अशी मागणी भोई समाज क्रांती दलाने केली आहे. याबाबत आ. समीर कुणावार यांना निवेदन देण्यात आले आहे.
दरवर्षी भोई समाजातील शेतकरी रेती उपस्यामुळे पडलेले खड्डे बुजवून परंपरेनुसार डांगरवाडी लावतात. पालिका प्रशासन दरवर्षी धरणाचे पाणी हिंगणघाट येथील नागरिकांना पिण्यासाठी घेते. पालिकेकडे पाणी साठविण्याकरिता मजबूत यंत्रणा नाही. परिणामी, रेतीने भरलेल्या बॅगा टाकून अस्थाई स्वरूपाचा बंधारा बांधण्यात आला आहे. यावर्षी बंधाऱ्याला धरणाचे पाणी अडविता आले नाही. बंधारा एका बाजूने फुटला. यामुळे डांगरवाड्या बुडून डांगर सडले व वाड्या नष्ट झाल्या. शिवाय नागरिकांसाठी असलेले पिण्याचे पाणीही वाया गेले. यापूर्वी डांगरवाडी लावण्याकरिता तलाठी येत होते आणि कर घेत होते. गत ५ ते ६ वर्षांपासून कर घेणे बंद केले. असे असले तरी पारंपरिक व्यवसाय म्हणून भोई शेतकरी डांगराचे पीक घेत आहेत.
भोई समाजाला डांगरवाडी, मासेमारी, चणे-फुटाणे आदी व्यवसायासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी. प्रत्येक जिल्ह्यात नियोजन करून डांगरवाडीसाठी पीक विमा योजना नैसर्गिक आपत्ती आल्यास १०० टक्के अनुदान मिळावे अशी मागणी भोई समाजाच्यावतीने राज्यातील सर्व आमदारांना तसेच राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव मंत्रालय आदींना गतवर्षी देण्यात आले होते; पण कार्यवाही झाली नाही.
आता पालिकेच्या बंधाऱ्यामुळे डांगरवाडीचे सुमारे आठ-दहा लाखांचे नुकसान झाले. यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी आ. कुणावार यांना दिलेल्यास निवेदनातून करण्यात आली. निवेदन सादर करताना भोईसमाज क्रांती दल अध्यक्ष अशोक मोरे, तालुकाध्यक्ष धर्मदास गाडवे, सचिव रमेश ढाले, सचिन मोरे, रवी मोरे, गणेश पढाल, वसंता मोरे, वसंता ढाले, बाबाराव सुरजूसे, सूर्यभान कोल्हे, गोविंद कोल्हे, गणेश कापटे, विजय कापटे, अरुण निमसडे, अशोक कोल्हे, रामकृष्ण मोरे, मंगेश मोरे, वसंता मोरे, राजू मोरे, संजय किंटुकर, नाना निमसडे, भाऊराव मेसरे, शंकर मोरे, वंदना मेसरे, रूपेश राजूरकर आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

लावलेला खर्च गेला वाया
भोई समाजातील शेतकरी दरवर्षी डांगराची शेती करतात. काही वर्षांपूर्वी या शेतकऱ्यांकडून कर वसूल केला जात होता; पण पाच-सहा वर्षांपासून तोही वसूल केला जात नाही. असे असले तरी शेतकरी परंपरागत शेती करतात. यंदाही शेतकऱ्यांनी डांगराची लागवड केली; पण पालिकेचा बंधारा फुटल्याने डांगरवाडीच वाहून गेली. परिणामी, शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही वाया गेला. यातून उत्पन्न मिळाल्यास कुटुंबाला आधार झाला असता; पण हे पिकही वाया गेल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.