शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

बोर नदीपात्राला पडली कोरड

By admin | Updated: May 24, 2016 02:17 IST

पावसाळा व हिवाळ्यात वाहणाऱ्या बोर नदीचे पात्र उन्हाळ्यात मात्र कोरडे पडू लागले आहे.

ओलिताचा प्रश्न गंभीर : शेतकऱ्यांवरील संकटांमध्ये भरसेवाग्राम : पावसाळा व हिवाळ्यात वाहणाऱ्या बोर नदीचे पात्र उन्हाळ्यात मात्र कोरडे पडू लागले आहे. बंधाऱ्यातील पाणी कमी होऊन शेतकऱ्यांच्या ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.कोपरा व चानकी या गावातून बोर नदी गेली आहे. या नदीवरून दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी शेतात जलवाहिनीच्या माध्यमातून सधनता प्राप्त केली. बाराही महिने शेतीला पाणी मिळायला लागल्याने शेतकरी ऊस व भाजीपाला पिकांकडे वळले; पण नदीपात्र बेशरम व अन्य जलवनस्पतीने वेढले गेले. नदीपात्र उथळ व्हायला लागल्याने पाणीसाठा कमी झाला. शेतकऱ्यांना पाणी मिळावे तसेच जलसाठा राहावा म्हणून बंधाऱ्यांची निर्मिती झाली. गत काही वर्षांपासून पाऊस कमी झाला. यामुळे पाणी वाहण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. नदीतील वाळू कमी झाली. यामुळे उन्हाळ्यात नदीला डबक्याचे स्वरुप आले आहे. शेतातील पिकांना पाण्याची गरज आहे. चानकी येथे सहा शेतकरी नदीच्या पाण्यावर अवलंबून असून त्यांच्यासमोर पिकांना जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने नदी पात्राची स्वच्छता व खोलीकरण मोहीम राबविल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत शेतकरी व्यक्त करतात. शेतीचा खर्च मोठा असून पिकांवर भविष्य अवलंबून असते; पण नदीच कोरडी पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)