शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत आघाडीचे अस्तित्व नवमतदारांच्या हाती

By admin | Updated: May 22, 2014 01:20 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वालाच सुरूंग लागला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वालाच सुरूंग लागला आहे. या निवडणुकीत देवळी, हिंगणघाट आणि वर्धा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची मते कमी झाली असली तरी धामणगाव व मोर्शी विधानसभा क्षेत्रात मात्र काँग्रेसच्या मतांत फारशी घसरण झाली नाही, तर आर्वी क्षेत्रात मात्र काँग्रेसच्या मतात वाढ झाली आहे. असे असले तरी नवमतदारांनी मात्र काँग्रेसला साफ नाकारल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ही बाब भविष्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धोकादायक ठरण्याची शक्यता बळावली असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या खेम्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

२00९ मध्ये सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ३ लाख ५२ हजार ५५२ मते मिळाली होती. या निवडणुकीत ही मते ३0 हजार ८१७ नी कमी झालेली आहे. भाजपला ५ लाख ३७ हजार ५१८ मते मिळाली. २00९ मध्ये २ लाख ५६ हजार ६२३ मते मिळाली होती. यात मतांमध्ये तब्बल २ लाख ८0 हजार ८९५ मतांची भर पडली आहे. या वाढलेल्या मतांत काही जुनीच असली तरी बहुतेक सर्वच नव मतदारांची मतेही भाजपकडेच वळली असल्याचे स्पष्ट होते. हे नवमतदार आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाच्या बाजुने वळते. यावरच विद्यमान आमदारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. यातून भाजप-सेनाही सुटण्याची शक्यता कमी आहे.

धामणगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ६४ हजार ४३४ मते मिळाली. २00९ मध्ये ही आकडेवारी ६४ हजार ८६८ इतकी होती. यामध्ये केवळ ४३४ मतांचाच फरक आहे. भाजपाला ८९ हजार ८५५ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपाला केवळ ४९ हजार ४८0 मते मिळाली होती. यात ४0 हजार ३७५ ने वाढ झाली आहे.

मोर्शी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ४९ हजार १३७ मते मिळाली. २00९ मध्ये ही आकडेवारी ४९ हजार १११ इतकी होती. यात केवळ २६ मतेच कमी मिळाली, तर भाजपाला तब्बल १ लाख ९८२ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपकडे ५२ हजार ५३८ मतेच होती. यात तब्बल ४८ हजार ४४४ मतांची भक्कम आघाडी मिळाली आहे.

आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ६२ हजार २८२ मते मिळाली होती. २00९ मध्ये काँग्रेसला ५६ हजार १२0 मतेच मिळाली. यात काँग्रेसची ६ हजार १६३ मते वाढली आहे हे विशेष. काँग्रेसच्या जुन्या मतात वाढ झालेले आर्वी हे एकमेव विधानसभा क्षेत्र आहे. भाजपाला ७७ हजार ६२३ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपला ४३ हजार ४३७ मते मिळाली होती. यात ३४ हजार १८६ मतांची वाढ झालेली आहे. देवळी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ५१ हजार २९६ मते मिळाली. २00९ मध्ये काँग्रेसला ५९ हजार ८४५ मते मिळाली होती. यात ८ हजार ५४९ मतांची घसरण झाली आहे. भाजपला ८१ हजार ८२२ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपला केवळ ३६ हजार ७७९ मतेच मिळाली होती. यात ४५ हजार ४३ मतांची वाढ झालेली आहे.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ४५ हजार १९४ मते मिळाली. २00९ मध्ये मतांची आकडेवारी ६0 हजार ११0 इतकी होती. यात १४ हजार ९१६ मतांनी काँग्रेस माघारली. भाजपला १ लाख १ हजार २0५ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपला केवळ ४३ हजार ४३७ मतेच मिळाली होती. यामध्ये तब्बल ५८ हजार १0२ मतांची आघाडी मिळाली आहे. वर्धा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ४९ हजार १२ मते मिळाली होती, तर २00९ मध्ये ही आकडेवारी ६२ हजार ४७७ च्या घरात होती. यात १३ हजार ४६५ मतांनी पिछाडीवर आहे, भाजपला ८५ हजार २९१ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपाला सर्वात कमी ३१ हजार २८६ मते मिळाली होती. यात ५४ हजार ५ मतांची नेत्रदीपक आघाडी मिळाली आहे. भाजप-सेना आमदारांपुडे ही मतांची आघाडी टिकविण्याचे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांपुढे ही मते वळविण्याचे कसब दाखवावे लागणार आहे.